शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जनता दरबारात १0८ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:31 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.

ठळक मुद्देतक्रारींचे तातडीने निराकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.‘जनता दरबार’ मध्ये जिल्हय़ातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी,  मांडलेल्या अडचणी आणि समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.  नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे  तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या  या जनता दरबारात जिल्हय़ातील नागरिकांकडून विविध  विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने  जिल्हा परिषद, पोलीस विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका,  नगरपालिका, महसूल विभाग,  कृषी विभाग व विद्युत विभागाशी  संबंधित तक्रारी, अडचणी आणि समस्या नागरिकांनी  पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विविध समस्या व अडचणींची  निवेदने पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारली. नागरिकांनी केलेल्या  तक्रारीसंबंधी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करीत  नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना  पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर पोलीस अधीक्षक  विजयकांत सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उ पजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

अवैध सावकारी प्रकरणांत तातडीने कारवाई करा!पालकमंत्र्यांचे पोलीस विभागाला निर्देशअवैध सावकारीसंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये  सावकारग्रस्त  नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, अवैध  सावकारीच्या प्रकरणांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी पोलीस विभागाला  दिले.अवैध सावकारी प्रकरणांत जिल्ह्यातील सावकारग्रस्त शे तकर्‍यांसह नागरिकांनी सन २0१२ मध्ये पोलिसांत दाखल  केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित सावकारांविरुद्ध अद्याप  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार,  जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित  पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात, सावकारग्रस्तांनी मांडली. या  तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली. तसेच अवैध सावकारी प्रकरणांत संबंधित सावकारांविरुद्ध  तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील यांनी पोलीस विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दिले.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख