शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारात १0८ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:31 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.

ठळक मुद्देतक्रारींचे तातडीने निराकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.‘जनता दरबार’ मध्ये जिल्हय़ातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी,  मांडलेल्या अडचणी आणि समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.  नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे  तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या  या जनता दरबारात जिल्हय़ातील नागरिकांकडून विविध  विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने  जिल्हा परिषद, पोलीस विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका,  नगरपालिका, महसूल विभाग,  कृषी विभाग व विद्युत विभागाशी  संबंधित तक्रारी, अडचणी आणि समस्या नागरिकांनी  पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विविध समस्या व अडचणींची  निवेदने पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारली. नागरिकांनी केलेल्या  तक्रारीसंबंधी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करीत  नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना  पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर पोलीस अधीक्षक  विजयकांत सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उ पजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

अवैध सावकारी प्रकरणांत तातडीने कारवाई करा!पालकमंत्र्यांचे पोलीस विभागाला निर्देशअवैध सावकारीसंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये  सावकारग्रस्त  नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, अवैध  सावकारीच्या प्रकरणांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी पोलीस विभागाला  दिले.अवैध सावकारी प्रकरणांत जिल्ह्यातील सावकारग्रस्त शे तकर्‍यांसह नागरिकांनी सन २0१२ मध्ये पोलिसांत दाखल  केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित सावकारांविरुद्ध अद्याप  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार,  जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित  पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात, सावकारग्रस्तांनी मांडली. या  तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली. तसेच अवैध सावकारी प्रकरणांत संबंधित सावकारांविरुद्ध  तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील यांनी पोलीस विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दिले.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख