शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जनता दरबारात १0८ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:31 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.

ठळक मुद्देतक्रारींचे तातडीने निराकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात  सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबार’ मध्ये  विविध विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या असून,  जिल्हय़ातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या अडचणी  आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना  दिले.‘जनता दरबार’ मध्ये जिल्हय़ातील नागरिकांनी केलेल्या तक्रारी,  मांडलेल्या अडचणी आणि समस्या पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.  नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे  तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या  या जनता दरबारात जिल्हय़ातील नागरिकांकडून विविध  विभागासंबंधी १0८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने  जिल्हा परिषद, पोलीस विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका,  नगरपालिका, महसूल विभाग,  कृषी विभाग व विद्युत विभागाशी  संबंधित तक्रारी, अडचणी आणि समस्या नागरिकांनी  पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विविध समस्या व अडचणींची  निवेदने पालकमंत्र्यांनी यावेळी स्वीकारली. नागरिकांनी केलेल्या  तक्रारीसंबंधी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करीत  नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना  पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर पोलीस अधीक्षक  विजयकांत सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.  रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उ पजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

अवैध सावकारी प्रकरणांत तातडीने कारवाई करा!पालकमंत्र्यांचे पोलीस विभागाला निर्देशअवैध सावकारीसंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये  सावकारग्रस्त  नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, अवैध  सावकारीच्या प्रकरणांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी पोलीस विभागाला  दिले.अवैध सावकारी प्रकरणांत जिल्ह्यातील सावकारग्रस्त शे तकर्‍यांसह नागरिकांनी सन २0१२ मध्ये पोलिसांत दाखल  केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित सावकारांविरुद्ध अद्याप  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार,  जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित  पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात, सावकारग्रस्तांनी मांडली. या  तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली. तसेच अवैध सावकारी प्रकरणांत संबंधित सावकारांविरुद्ध  तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील यांनी पोलीस विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दिले.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख