शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १०४ तक्रारी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:32 IST

अकोला : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील  यांचा जनाता दरबार दर सोमवार ऐवेजी  मार्च महिन्याच्या पहिल्या  शनिवारी रोजी घेण्यात आला. 

ठळक मुद्देपालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात  करण्यात आले होते.   प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली.नवीन तक्रार कर्त्यांना 15 दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  तक्रार

अकोला : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील  यांचा जनाता दरबार दर सोमवार ऐवेजी  मार्च महिन्याच्या पहिल्या  शनिवारी रोजी घेण्यात आला.  या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज  विविध विभागाच्या एकुण  १०४ तक्रारी प्राप्त झाल्या. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात  करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी  संजय खडसे आदींसह विविध विभागाचे  विभागप्रमुख उपस्थित होते.           

 विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा  सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की,  व्यक्तीगत लाभाच्या योजनासह सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच  यावर्षीचा लक्षांक, केलेली पुर्तता यासंबंधीचे  सर्व माहिती विभागप्रमुखांनी  बैठकीला येतांना सोबत आणावी असेही ते म्हणाले. विभागाच्या  विविध अधिका-यांनी आपल्या विभागाची परिपुर्ण माहिती जनता दरबारात उपस्थित राहतांना  सोबत आणावी. नवीन तक्रार कर्त्यांना 15 दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी  तक्रार कर्त्यांना दिला. प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील  जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा  आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर  पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची  प्राथमिक माहिती घेवूनच  अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे,  असेही ते म्हणाले.

               आज झालेल्या जनता दरबारात एकूण १०४ तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक  तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामाबाबतच्या  लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी  पालकमंत्री यांना  दिल्या.  तक्रारींचा निपटारा करण्यासाठी  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी  पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारातील प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी  काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा  त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Akolaअकोलाguardian ministerपालक मंत्री