शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

१२ गावांमध्ये होणार १00 कोटींची पाणीपुरवठय़ाची कामे!

By admin | Updated: March 18, 2016 02:00 IST

जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत अमरावती -बुलडाणा जिल्ह्यातील गावांमधील कामांचा समावेश.

संतोष येलकर/अकोला जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत अमरावती विभागातील अमरावती व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) करण्यात येणार आहेत.जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्र.२ अंतर्गत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने अमरावती विभागातील ४ आणि बुलडाणा जिल्ह्यातील ८ गावांची निवड केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील शहराजवळील या गावांमध्ये प्रतिमानसी प्रतिदिवस ७0 लीटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येकी ५0 कोटी याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यात १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने १६ मार्च रोजी मंत्रालयात पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील ४ गावे आणि बुलडाणा जिल्ह्यातील ४ गावांमध्ये करावयाच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांसंबंधी प्रस्तावांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांसंबंधी प्रस्तावांना प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तत्त्वत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे प्रस्ताव परत पाठविण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या. अमरावती जिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याच्या कामांसाठी तत्त्वत: प्रशासकीय मान्यता मिळाल्याने, निविदा प्रक्रियेनंतर संबंधित गावांमध्ये ह्यमजीप्राह्णमार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.पाणीपुरवठा योजनांची अशी होणार कामे! जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या १२ गावांमध्ये १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये पाण्याचा उद्भव, जलवाहिनी टाकणे, जलकुंभांची बांधकामे, अशुद्ध पाण्याची जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व वितरण व्यवस्था इत्यादी प्रकारची कामे केली जाणार आहेत.