शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कापूस उत्पादकांचे १00 कोटींचे चुकारे थकले!

By admin | Updated: January 26, 2015 01:32 IST

राज्यात ११३ लाख क्विंटल कापूूस खरेदी.

राजरत्न सिरसाट /अकोला : कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडे शेतकर्‍यांचे १00 कोटींचे चुकारे थकल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. राज्यात आतापर्यंत शेतकर्‍यांनी ११३ लाख २६ हजार २२0 क्विंटल कापूस विकला असून, सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खेरदी केला आहे. यावर्षी प्रथमच भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) उप अभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात १११ केंद्रावर कापूस खरेदी सुरू केली, पण चुकारे तर थकलेच आणि चार दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांची प्रचंड वाताहत होत आहे. यावर्षी कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारचा नाफेडशी करार झाला नसल्याने कापूस खरेदी करणार कोण, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) राज्यात पणन महासंघाने सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून हमी दराने कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. परंतु कापसाची आवक वाढल्याने १११ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी चार दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकर्‍यांची वाताहात सुरू आहे. राज्यात आजमितीस सीसीआयने ४५ लाख ५६ हजार ५५३ क्विंटल कापूस खरेदी केला असून, खासगी बाजारात शेतकर्‍यांनी ५४ लाख ९६ हजार ८७१ क्विंटल कापूस विकला आहे. पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी शेतकर्‍यांना ५१0 कोटी चुकारे द्यायचे होते तथापि पणनने आतापर्यंत चारशे कोटी चुकारे केले आहेत. दरम्यान, पावसामुळे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. येत्या मंगळवारपर्यंत खरेदी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत ५१0 कोटींपैकी शेतकर्‍यांना ४१0 कोटींचे चुकारे केले आहेत. यंदा सीसीआयच्या निर्देशानुसारच शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पणण महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन पी हिराणी यांनी सांगीतले.