शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कापूस उत्पादकांचे १00 कोटींचे चुकारे थकले!

By admin | Updated: January 26, 2015 01:32 IST

राज्यात ११३ लाख क्विंटल कापूूस खरेदी.

राजरत्न सिरसाट /अकोला : कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडे शेतकर्‍यांचे १00 कोटींचे चुकारे थकल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. राज्यात आतापर्यंत शेतकर्‍यांनी ११३ लाख २६ हजार २२0 क्विंटल कापूस विकला असून, सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खेरदी केला आहे. यावर्षी प्रथमच भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) उप अभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात १११ केंद्रावर कापूस खरेदी सुरू केली, पण चुकारे तर थकलेच आणि चार दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांची प्रचंड वाताहत होत आहे. यावर्षी कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारचा नाफेडशी करार झाला नसल्याने कापूस खरेदी करणार कोण, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) राज्यात पणन महासंघाने सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून हमी दराने कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. परंतु कापसाची आवक वाढल्याने १११ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी चार दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकर्‍यांची वाताहात सुरू आहे. राज्यात आजमितीस सीसीआयने ४५ लाख ५६ हजार ५५३ क्विंटल कापूस खरेदी केला असून, खासगी बाजारात शेतकर्‍यांनी ५४ लाख ९६ हजार ८७१ क्विंटल कापूस विकला आहे. पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी शेतकर्‍यांना ५१0 कोटी चुकारे द्यायचे होते तथापि पणनने आतापर्यंत चारशे कोटी चुकारे केले आहेत. दरम्यान, पावसामुळे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. येत्या मंगळवारपर्यंत खरेदी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत ५१0 कोटींपैकी शेतकर्‍यांना ४१0 कोटींचे चुकारे केले आहेत. यंदा सीसीआयच्या निर्देशानुसारच शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पणण महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन पी हिराणी यांनी सांगीतले.