शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

कापूस उत्पादकांचे १00 कोटींचे चुकारे थकले!

By admin | Updated: January 26, 2015 01:32 IST

राज्यात ११३ लाख क्विंटल कापूूस खरेदी.

राजरत्न सिरसाट /अकोला : कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडे शेतकर्‍यांचे १00 कोटींचे चुकारे थकल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. राज्यात आतापर्यंत शेतकर्‍यांनी ११३ लाख २६ हजार २२0 क्विंटल कापूस विकला असून, सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खेरदी केला आहे. यावर्षी प्रथमच भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) उप अभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात १११ केंद्रावर कापूस खरेदी सुरू केली, पण चुकारे तर थकलेच आणि चार दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांची प्रचंड वाताहत होत आहे. यावर्षी कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारचा नाफेडशी करार झाला नसल्याने कापूस खरेदी करणार कोण, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) राज्यात पणन महासंघाने सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून हमी दराने कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. परंतु कापसाची आवक वाढल्याने १११ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी चार दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकर्‍यांची वाताहात सुरू आहे. राज्यात आजमितीस सीसीआयने ४५ लाख ५६ हजार ५५३ क्विंटल कापूस खरेदी केला असून, खासगी बाजारात शेतकर्‍यांनी ५४ लाख ९६ हजार ८७१ क्विंटल कापूस विकला आहे. पणन महासंघाने १२ लाख ७२ हजार ७९६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यापोटी शेतकर्‍यांना ५१0 कोटी चुकारे द्यायचे होते तथापि पणनने आतापर्यंत चारशे कोटी चुकारे केले आहेत. दरम्यान, पावसामुळे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. येत्या मंगळवारपर्यंत खरेदी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत ५१0 कोटींपैकी शेतकर्‍यांना ४१0 कोटींचे चुकारे केले आहेत. यंदा सीसीआयच्या निर्देशानुसारच शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पणण महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन पी हिराणी यांनी सांगीतले.