शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

राज्यात बटाट्याचे १०० कोटींचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:27 IST

एकट्या तळेगाव, पुणे भागात यामुुळे शेतकऱ्यांचे २५ कोटींवर तर राज्यात १०० कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

- राजरत्न सिरसाटअकोेला: ऊर्जा शक्ती निर्माण करणारे कर्बोदके (कार्बोहाइड्रेट) असलेल्या बटाट्याला ‘कोरोना’मुळे अवकळा आली आहे. वेफर, चिप्स बनविणारे कारखाने ‘लॉक डाऊन’मुळे बंद असल्याने बाजारातील मागणी घटली आहे. परिणामी, बाजारात बटाटा प्रति किलो ५ ते ७ रुपये कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .एकट्या तळेगाव, पुणे भागात यामुुळे शेतकऱ्यांचे २५ कोटींवर तर राज्यात १०० कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.राज्यात अलीकडे बटाट्याचे क्षेत्र वाढले असूून, मंचर, पुसेगाव आणि विदर्भात बटाटा पिकाचे हब तयार झाले आहे. पुणे, वाशी, पुसेगाव, मंचर येथे बटाट्याची बाजारपेठ आहे; परंतु कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने २३ मार्चच्या मध्यरात्रीपासूनन देशात ‘लॉकडाऊन’ घोषित केले आहे. यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. परिणामी, कमी क्षेत्र असलेल्या शेतकºयांना शेतमाल बाजारात घेऊन जाणे कठीण झाले आहे. अनेक शेतकºयांनी घेतलेले कर्ज व इतर घरगुती खर्चासाठी पैशाची नितांत गरज आहे. तेच तुरळक शेतकरी बटाटा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत; परंतु बटाट्याचे दर घटले असून, ५० किलो बटाट्याच्या गोणीमागे शेतकºयांना ४०० रुपये कमी दर दिले जात आहेत. राज्यात शेतकºयांनी प्रक्र्रिया उद्योग सुरू केले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मनोज बुरड यांंचा एमआयडीसीमध्ये चिप्स, वेफर्स बनविण्याचा उद्योग आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सध्या उत्पादन बंद असून, त्यांच्याकडे तयार असलेल्या पाकीटबंद मालाची मुदत संपत असल्याने हे नुकसानदेखील त्यांना सहन करावा लागत आहे. आजमितीस त्यांच्याकडे ७० हजारांवर वेफर्स, चिप्स बनून तयार होते. त्यांच्याकडे शेती असून, बटाटा लागवड केली आहे; परंतु काढलेला बटाटा २५ दिवसांच्यावर उष्ण हवामानात टिकत नसल्याने बटाटा सडणार आहे.

देशात २० टक्क्यांवर बटाट्याचे नुकसान देशात बटाट्याचे २१ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात ३० ते ३५ हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढले आहे. आजमितीस देशात बटाट्याचे उत्पादन ५ कोटी १३ लाख १० हजार मेट्रिक टन होत आहे. महाराष्ट्रात बटाट्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याची संधी आहे; परंतुु कोरोनाचा परिणाम देशात २० टक्क्यांहून अधिक तर राज्यात ४४० टक्क्यांपर्यंत बटाट्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज तज्ज्ञांंनी वर्तविला आहे. बटाट्याचे दर एका ५० किलोच्या गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांनी घटले आहेत. कर्ज परतफेड, घर खर्चासाठी नितांंत गरज असलेले शेतकरीच बटाटा बाजारात विक्र्रीसाठी घेऊन येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे शीतगृह नसल्याने बटाटा सडत आहे. एकट्या तळेगाव, पुणे भागात २५ कोटींवर नुकसान झाले आहे.- राजेंद्र्र बारवे, घाऊक विक्रेता कांदा, बटाटा वाशी मार्केट (नवी मुंबई)

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती