शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

१ हजार ३५४ माेफत प्रवेश निश्चित, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अडवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

अकाेला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत अर्थात आरटीईअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३५४ प्रवेश निश्चित झाले आहेत. ...

अकाेला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत अर्थात आरटीईअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३५४ प्रवेश निश्चित झाले आहेत. एकूण जागांच्या तुलनेत अजूनही ६०६ जागांवरील प्रवेश बाकी असून, सध्या कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावर हाेत आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या पडताळणीच्या नावाखाली पालकांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात १ हजार ९६० जागांसाठी यावर्षी ४ हजार ७२७ ऑनलाइन अर्ज करण्यात आले हाेते, त्यानुसार प्रवेशासाठी पहिली साेडत ७ एप्रिल रोजी पुणे येथे ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. सध्या प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळा स्तरावर लगबग सुरू असून, शाळा प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदतवाढ मिळूनही गती मंदावलेलीच

आरटीई प्रवेशासाठी शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना ३० जून राेजी मुदतवाढीचा आदेश पाठविला हाेता. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या ओटीपीच्या तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यास विलंब हाेत असल्याने निवड यादीतील मुलांच्या प्रवेशनिश्चितीसाठी अडचणी निर्माण हाेत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला ९ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा २३ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला.

अशी आहे स्थिती

- नोंदणीकृत शाळा - २०२

- प्रवेशासाठी प्राप्त अर्ज - ४७०७

- आरक्षित जागा - १९६०

- प्राप्त अतिरिक्त अर्ज - २७४७

- आतापर्यंत निवड झालेले - १८१७

- तात्पुरते प्रवेश - ६७८

- निश्चित प्रवेश - १३५४

शिक्षणाधिकारी म्हणतात

आरटीईअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे निर्देश शाळांना दिले आहेत. या प्रवेशासाठी कुठे अडवणूक हाेत असेल तर पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी.

डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

शाळांचे पैसे कधी देणार

आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या शाळांना शासनाकडून मिळणारा निधी अजूनही वितरित करण्यात आलेला नाही. यासंदर्भात शाळांनी अनेकदा तक्रारी केल्या. आंदाेलनाची भूमिका घेतल्यावरही शाळांच्या हक्काचे पैसे शाळांना मिळाले नाहीत. सध्या काेराेनामुळे शाळाच बंद असल्याने शालेय व्यवस्थापनाचे अर्थकारणच ठप्प झाले आहे, त्यामुळे अशा स्थितीत हा निधी वितरित झाला तर शाळांना माेठा दिलासा मिळेल.