शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
3
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
4
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
5
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
6
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
7
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
9
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
10
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
11
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
12
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
13
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
14
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
15
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
16
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
17
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
18
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
19
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
20
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल

जपून वापरा पाणी अन्यथा संकट!

By admin | Published: November 28, 2014 11:59 PM

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे. कोपरगाव, शिर्डी, कर्जत, अकोले या शहरांसाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा या शहरातील नागरिकांना आज पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मात्र पाणी जपून वापरले नाही, तर ही स्थिती कायम राहील, याची शाश्वती नाही. नगर शहरातील उपनगरे मात्र आजच पाण्यासाठी कासावीस आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या तोंडावर आहे. शहरी नागरिकांनी ‘पाणी वापरावे जपून’ हा मंत्र अंगीकारणेच अधिक योग्य ठरेल. ‘मुळा’त मुबलक साठा... : ‘मे’पर्यंत निवांत अहमदनगर : मुळा धरणात यंदा मुबलक पाणी साठा असल्याने नगर शहरातील पाणी पुरवठ्याची चिंता महापालिकेला नाही. धरणातील पाणी पातळी १७५२ फुटांच्या खाली गेल्यानंतरच शहर पाणी उपसा योजनेला घरघर लागण्यास सुरूवात होते. मात्र ही पातळी अजून ३ हजार फूट उंचीवर आहे. मे २०१५ पर्यंत तरी शहराच्या पाण्याची चिंता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मुळा’ धरणातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. १९७३,१९८६,१९९७ आणि आता २००८ मध्ये १२४ कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात आली. शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून लगतच्या ९ ग्रामपंचायतींना पाणी दिले जाते. शहरापासून मुळा धरण ३५ किमी अंतरावर असून तेथून शहराला पाणी पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या चार लाखाच्या आसपास पोहचली आहे.शहरातील या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ६२ दशलक्ष लीटर पाणी रोज लागते. धरणातून पाणी नगरपर्यत पोहचताना गळती होऊन प्रत्यक्षात ५२ दशलक्ष लीटर पाणी वितरण होते. मुळा धरणातील पाणी पातळी खालावली की शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. यंदा मुळा धरणात मुबलक पाणी साठा आहे. धरणातील पाण्याची पातळी २ हजार फुटापेक्षाही अधिक आहे. १७५२ फुटाच्या खाली पाणी पातळी जाण्यास मे तरी उजाडेल असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.