शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
4
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
5
LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा
6
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
7
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
8
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
9
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
10
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
11
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
12
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
13
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
14
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
15
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
16
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
17
दारुच्या आहारी गेला होता कपिल शर्मा; आत्महत्येसारखं उचलणार होता टोकाचं पाऊल
18
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
19
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

नगरच्या सुहास मुळे यांच्या पत्राची थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून दखल; सुमोटो जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:03 PM

अहमदनगर: जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र पाठवून न्यायालयातील सर्व कामकाज व्हॅर्चुअल करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. 

अहमदनगर: जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र पाठवून न्यायालयातील सर्व कामकाज व्हॅर्चुअल करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. 

या पत्रात मुळे यांनी म्हटले होते की, सर्वसामान्य माणसाला सामान्य परिस्थितीमध्ये न्यायासाठी झगडावे लागत आहे. त्यात भर म्हणून या करोना संकटाने सर्वजण प्रचंड अडचणीत आल्यामुळे न्यायव्यवस्था पूर्ण अडचणीत आली आहे. अशावेळी सर्व जगाने स्वीकारलेली व्हर्चुअल कोर्ट ही संकल्पना जनहित याचिका पासून तर रिट पिटीशन पर्यंत व इतरही सर्व केसच्या बाबतीत लागू केल्यास,  त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्थेमधील किचकट प्रक्रिया थोडीशी दूर ठेवून ते सामान्यांसाठी लवचिक केल्यास खऱ्या अर्थाने भारतीय राज्य घटनेचा हेतू साध्य होईल.

समाजातील शेवटच्या वंचित घटकाला देखील विनाविलंब न्याय मिळणे शक्य होईल. अन्यथा आजचा सामान्य माणूस स्थानिक कोर्टाची पायरी चढताना दहा वेळेस जिथे विचार करतो , तिथे एखाद्या शासनाविरुद्ध वा प्रशासनाविरुद्ध त्यांच्या राजकारणी अन्यायाविरुद्ध सामान्य माणसाला जर लढायचे असेल, तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे एकमात्र  पर्याय असले तरी सामान्य माणूस त्याचा विचार देखील करू शकत नाही. कारण कुठल्याच बाबतीत तिथे त्याला परवडणारे राहिलेले नाही. याचाच फायदा घेऊन समाजातले धनदांडगे, सत्ताधारी आणि मसल पावर असलेले लोक

इतर दुर्बल आणि सामान्य लोकांवर सतत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अत्याचार करीत राहतात व जनतेला ते निमूटपणे सोसावा लागतो.  कारण न्याय मागण्याची शक्ती व ऐपत फार कमी लोकांमध्ये राहिलेली आहे ही गोष्ट जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या भारताला निश्चितच भूषणावह नाही, यात बदल आवश्यक आहेत.  म्हणून वेगवेगळे मुद्दे मांडून मुद्देसूद पद्धतीने सुहास मुळे यांनी केंद्रीय न्याय व विधी मंत्रालय त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पत्र पाठवून सामान्य माणसांसाठी भारतातील सर्व नागरिकांसाठी सर्रासपणे सामान्य.

केसेस पासून तर जनहित याचिका व रीट पिटीशन पर्यंत सर्व न्यायालयीन प्रक्रियेचे सुलभीकरण योग्य ते कायदे व नियम पाळून लागू करण्यासंदर्भात या प्रणालीमध्ये काही बदल सुचवणारे पत्र पाठवले होते.  या पत्रातील सर्व मुद्दे विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरदचंद्र बोबडे  तसेच न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी उचलून धरून सर्व समाजोपयोगी मुद्दे ग्राह्य धरून सदर पत्राचे थेट जनहित याचिका मध्ये सूमोटो (स्वतःच्या अधिकाराच्या अखत्यारीत) रुपांतरण केले व त्याला 48836 /20असा नंबर देऊन जनहित याचिका

दाखल करून घेतली आहे. असा सुखद प्रकार आपल्या पंचक्रोशीत एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने अभ्यास करून पाठविलेल्या पत्राला थेट जनहित याचिकेत रूपांतरण सर्वोच्च न्यायालयाने करणे, हे

कदाचित प्रथमच घडले असावे.  या जनहित याचिकेमधून न्यायिक प्रणालीमध्ये सुचवलेले बदल झाल्यास

काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भारतीय नागरिकांना न्यायदान प्रक्रियेमध्ये अतिशय सुलभता येणार असल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. कायद्याचा खऱ्या अर्थाने दरारा वाढेल यात शंका नाही, असे मुळे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय