शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

सोनई तिहेरी हत्याकांड : त्याने प्रेम केले... त्याच्यासह मित्रांचेही आयुष्य संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 8:28 PM

ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच...

अहमदनगर : ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच तिच्या वडिलांसह भाऊ आणि चुलत्यांनी त्या प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांनाही अमानूषपणे मारून टाकले.

पाच वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा) येथे घडलेल्या भीषण तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी धरले. दोषी ठरलेल्या या सहापैकी पाच आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. या दोषींना आता न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पाच वर्षापूर्वी सोनई येथील दरंदले कुटुंबातील मुलगी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात बी. एडचे शिक्षण घेत होती. याच संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला सचिन सोहनलाल घारू आणि तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली. कनिष्ठ जातीतील मुलावर प्रेम केल्याने संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनला संपविण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी २०१३ रोजी शौचालयाचे सेफ्टी टँक दुरूस्तीचा बहाणा करून व जास्त मजुरीचे आमिष दाखवून सचिन याच्यासह संदीप राजू थनवार व राहुल कंडारे (सर्व रा. गणेशवाडी ता. नेवासा) यांना सोनई जवळील विठ्ठलवाडी येथे बोलावून घेतले. तेथे संदीप थनवार याला शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये बुडवून मारले. 

राहुल व सचिन यांचे कोयत्याने व वैरण कापण्याच्या अडकित्याने तुकडेतुकडे करून हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सदर मुलीचे वडील पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कु-हे (मावसभाऊ), नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पुरावे न मिळाल्याने रोहिदास फलकेवर न्यायायालयात दोष सिद्ध होऊ शकला नाही.

‘ती’ फितूर झाली

सचिन घारू याचे ज्या मुलीवर प्रेम होते, ती मुलगी या खटल्यातील महत्त्वपूर्ण साक्षीदार होती. न्यायालयात मात्र सरतपासणी आणि उलटतपासणीदरम्यान ही मुलगी काहीच बोलली नाही. त्यामुळे तिला फितूर म्हणून घोषित करण्यात आले.

तपास सीआयडीकडे

या हत्याकांडाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. या प्रकरणाचा प्रथम तपास सोनई पोलीस त्यानंतर श्रीरामूर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने केला. दलित संघटनांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर सीआयडीनेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

फलकेचा कटात सहभाग नसल्याचे उघड

सोनई हत्याकांडात दरंदले यांचा नातेवाईक अशोक फलके याच्यावर कट रचल्याचा आरोप होता. मात्र, पोलिसांनी जप्त केलेला लाकडी दांडा व त्याचे रासायनिक विश्लेषण केलेले नसल्याने रक्ताचे डाग आढळून आले नाही. तसेच या परिसरात असलेला मोबाईल टॉवर हा दहा किलोमीटर परिसर व्यापत असल्याने फलके हा घटनास्थळी हजर असल्याचे वा कट रचल्याचे पुरावे नसल्याचे त्याचे वकील अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून फलके यास या खटल्यात निर्दोष ठरविले.

वृद्धावस्थेतील एकुलता एक सहारा असलेल्या माझ्या सचिनचा अत्यंत निर्दयपणे खून केला. या सर्वांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यावी. या उतारवयात मला माझ्या मुलीकडे दिवस काढावे लागत आहेत. मुलगा असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती.- कलाबाई घारू, मयत सचिन घारूची आई

माझ्या भावाचा निर्दयपणे खून करणा-यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भावाच्या आत्म्याला शांती मिळेल़ या घटनेनंतर घरी आलेल्या मंत्र्यांनी आर्थिक मदत, तसेच नोकरीचे आश्वासन दिले, मात्र चार वर्षे होऊनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही़- सागर कंडारे, मयत राहुल कंडारेचा भाऊ

भावाचा निर्दयपणे खून होण्याच्या घटनेला चार वर्षे झाली असून, न्यायालयाने यातील सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी. आई व माझा सचिन हा एकमेव सहारा होता. आईला सध्या मी सांभाळत असले, तरी भावाची उणीव कायमस्वरूपी राहणार आहे.- रिनाबाई घारू, मयत सचिन घारूची बहीण

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा