शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 9:21 PM

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले,  शहराच्या एका वर्धापनदिनी आम्ही भिस्तबाग महालावर विद्युत रोषणाई केली होती. त्यावेळी ही वास्तू इतकी अप्रतिम दिसत होती की ते चित्र पाहून नगरकर आचंबित झाले. सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आपण असे जतन केले व कल्पकता वापरुन त्यांचा विकास केला तर पर्यटक नगरला गर्दी करतील. भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दूरवरून लोक येऊ शकतात. तेथे वीज, पाणी यांचा वापर करुन रात्री काही सांस्कृतिक ‘शो’ सुरु करता येऊ शकतो. या किल्ल्याभोवती मोठे खंदक आहेत त्याचाही अप्रतिम वापर करुन घेता येईल. पर्यटनस्थळे विकसित झाली की आपोआप छोटे-मोठे व्यवसाय, हॉटेल, रिक्षा, ट्रॅव्हल एजन्सी यांना रोजगार मिळेल. आपण गावातील रस्ते चांगले केले व पर्यटनस्थळे विकसित केली तरी शहर कितीतरी बदलेल. हे काम फार अवडघ नव्हे. केवळ इच्छाशक्ती हवी आहे. या वर्षभराचा अजेंडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. भाराभर अपेक्षा नोंदवून उपयोग नाही. माझ्या मते पर्यटनाचा आराखडा आपण निर्माण केला व वाडिया पार्कचा गुंता सोडविला तरी दोन मोठे प्रश्न मार्गी लागतील. नगरची पर्यटन स्थळे विकसित केल्यास शिर्डी, शिंगणापूरला जाणारे पर्यटक नगरमध्ये थांबतील. त्यातून अर्थचक्र फिरु शकेल, असेही ते म्हणाले.    अहमदनगर शहराच्या विकासाबाबत आजवर चर्चाच खूप झाली. आता ठोस कृती कार्यक्रम हवा आहे. या वर्षात  किमान नगरच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारने कृती आराखडा ठरविला तरीही विकासाच्यादृष्टीने मोठे पाउल पडेल. हे वर्ष पर्यटनस्थळांच्या विकासाभोवती केंद्रित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.