शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 6:17 PM

अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.

राजूर : मेहनत, मशागत आणि जिद्दीला योग्य व्यवस्थापनाची जोड देत युवा शेतक-याने काकडीची बाग फुलवली. त्याने केलेल्या कष्टाला फळही मिळाले.दिवसाआड तीन टनापर्यंत उत्पादनही सुरू झाले. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.पारंपरिक शेतीला फाटा देत विठ्ठल चौधरी या तरुण शेतकऱ्याने कर्जाऊ रक्कम घेत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर क्षेत्रात शेडनेट हाऊसची उभारणी केली. त्यात ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. पावसाळी हंगामात झेंडू घेत त्यांनी दमदार सुरुवात केली. तर उन्हाळी पिकाचे नियोजन करत शिमला मिरची आणि काकडीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यावर्षी काकडीचा बाग उभी करण्याचे ठरवले. नियोजनाप्रमाणे ४८ हजार रुपयांचे काकडीचे बी त्यांनी खरेदी केले. शेणखताचा वापर करत शेतीची मशागत केली. बेड तयार करत नवीन मल्चिंग पेपरचा वापर करत बियांचे रोपण केले. चोख व्यवस्थापनामुळे ३५ दिवसांत काकडीच्या बहरलेल्या वेलींना मोठ्या प्रमाणात काकड्या लगडल्या. या वर्षी कर्ज फिटणार असा आशावाद निर्माण झाला. पहिला तोडा सुरू होणार तोच लॉकडाऊन सुरु झाले. वाहतूक व्यवस्था नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्याने मोठी समस्या त्यांना निर्माण झाली. बाजारपेठ सुरू झाली असली तरी फक्त साडेतीन टन माल व्यापारी घेत आहेत. उरलेला माल जनावरांना चारा म्हणून विठ्ठल चौधरी वापरु लागले.

चौदा लाख रुपये खर्च करून तीन वर्षापुर्वी एक एकर क्षेत्रात शेडनेट उभे केले. दहा लाख रुपये कर्जाऊ घेतले. आत्मविश्वासाने पारंपरिक शेतीला बाजूला करत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेती सुरू केली. पहिल्या वर्षी तीन लाख रुपयांचे खर्चासह उत्पन्न मिळाले. दुसरे वर्षी बाजार भाव कोसळले. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. उन्हाळ्यात काकडीचे नियोजन केले. नियोजनाप्रमाणे उत्पन्नही मिळू लागले. कोरोनामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडली. काकड्या जनावरांसाठी  वापरत आहे. – विठ्ठल चौधरी, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले