शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

इंदिरा गांधींना साथ देणारा बॅरिस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 2:10 PM

इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी लावली़ त्यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला़ अनेक काँगे्रसी निष्ठावंत म्हणवणारे नेतेही इंदिरा गांधींना सोडून गेले़ काँगे्रसची वाताहत झाली़ आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँगे्रसला मोठा पराभव सहन करावा लागला़ तत्कालीन जनता पक्षाच्या सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात आणीबाणीप्रकरणी इंदिरा गांधी यांच्यावर खटला दाखल केला़ त्यावेळी बॅरिस्टर रामराव आदिक यांनी गांधी यांचे वकीलपत्र घेतले आणि त्यांना निर्दोष सोडविलेही़ 

अहमदनगर : कॉग्रेससमोर सध्या कठीण काळ आहे. १९७८ ते १९८० सालातही असाच कठीण काळ होता़ पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बॅरिस्टर रामराव आदिक यांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती, ते अहमदनगरचे होते.  काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात आदिक यांच्याविषयी काढलेले हे उद्गार दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांचे काँगे्रसमधील त्यावेळचे महत्व आणि कार्य अधोरेखित करते़ खानापूर (ता. श्रीरामपूर) या खेडेगावात २४ डिसेंबर १९२८ रोजी रामराव यांचा जन्म झाला़ त्यांचे प्राथमिक शिक्षण उंदिरगावला (आजोळ) झाले. खानापूरपासून ते पाच किलोमीटर शाळेत पायी जात. वेळप्रसंगी आजोळी थांबत. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. चार भावंडांचे हे कुटुंब. रामराव हे त्यात थोरले. लक्ष्मणराव, केशवराव, गोविंदराव व बहीण शांताबाई ही भावंडे. वडिलांच्या निधनामुळे रामराव यांच्यावरच वडिलकीची जबाबदारी आली़रामराव यांचे चुलते जे रंजकराव मास्तर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, त्यांनीच रामराव यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. त्यांनी  रामराव यांना चौथीनंतर पुणतांबे येथे शिक्षणाला पाठविले. त्यावेळच्या सातवीच्या परीक्षेत ते जिल्ह्यात पहिले आले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नगरला जाण्याचा निर्णय घेतला. मॅट्रीक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी बेलापूर साखर कारखान्यात येणाºया टाईम्स आॅफ इंडियात आपण पास झालो का हे पाहण्यासाठी त्यांनी पेपर चाळला. फर्स्ट क्लासच्या यादीत त्यांचे नाव होते. पुढे नगरलाच कॉलेजात ते दाखल झाले. सकाळी कॉलेज आणि दुपारी त्यावेळच्या पोलीस खात्यात नोकरी, अशा कठीण स्थितीत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.त्यावेळचे खानापूर हे गोदावरी नदीकाठचे गाव आजच्यासारखे विकसित नव्हते. शिक्षण घेणे म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग अशी त्यावेळची धारणा़ मुलांनी शेतीत कामाला यावे, अशीच लोकांची धारणा. अशा परिस्थितीत रामराव आदिकांनी नगरमध्ये काम आणि शिक्षण अशी दुहेरी कसरत केली़ पुढे त्यांनी पुण्याला लॉ कॉलेजला प्रवेश मिळविला. एक वर्ष तिथे लॉ केल्यानंतर मुंबई गाठली. मुंबईतच त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. १९५० मध्ये रामराव विवाहबद्ध झाले. त्यावेळी मुंबईतील माधवराव कडणे (मूळचे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीचे) हे उद्योजक होते. त्यांना भगिरथी या एकमेव कन्या होत्या. माधवराव हे एका उच्च शिक्षित वराच्या शोधात होते. त्यांना रामराव यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी रामराव यांनी नुकतीच मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली होती. आपल्या गावाकडचा एक तरुण प्रॅक्टिस करतो आहे, हे समजल्यावर माधवरावांनी गावाकडची थोडी माहिती घेतली. त्यावेळच्या बेलापूर कंपनीच्या (साखर कारखाना) शेतकी विभागात कार्यरत असलेले गोडगे हे माधवरावांचे साडू होते. त्यांच्याकरवीच रामराव यांचे नातेसंबंध पाहून सोयरीक जुळली.रामराव यांना अफाट स्मरणशक्तीची अद्भूत देण लाभली होती. आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर थोड्याच कालावधीत रामरावजींनी हायकोर्टात आपली छाप सोडली. गावाकडून आलेल्या रामराव यांना गरिबीची जाण होती. राज्याच्या कानाकोपºयातून हायकोर्टात येणाºया दीनदुबळ्यांसाठी रामराव यांचा मोठा आधार वाटे. गरीब शेतकरी आणि अनुसूचित किंवा मागासवर्गीयांचे खटले ते विशेष लढायचे. वेळप्रसंगी ते फी घेत नसत. गरिबांचे वकील म्हणून त्यांचा गौरव झाला़ भारताची राज्यघटना म्हणजे या राष्ट्राचा विवेक आहे, असे ते नेहमी म्हणत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला.मुंबई हायकोर्टाच्या बार असोसिएशनचे ते अध्यक्षही झाले. राज्य वकील संघटनेचेही ते काही काळ अध्यक्ष राहिले. १९६३ ते १९६९ मध्ये ते बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. बार कौन्सिल आॅफ इंडियाचेही सदस्य राहिले. परभणी जिल्ह्यातील अकोल्यात भरलेल्या महाराष्ट्र राज्य वकील परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांची योग्यता पाहून राज्य सरकारने त्यांना महाअधिवक्तापदी नेमले. मुंबई हायकोर्टाच्या ११२ वर्षांच्या इतिहासातील ते पहिले मराठी भाषिक महाअधिवक्ता झाले. सरकारचे मानद कायदा सल्लागार म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपविली गेली. राज्याच्या लॉ कमिशनचे ते अध्यक्ष राहिले. गरिबांसाठीच्या कायदा सेवा बोर्डाचे उपाध्यक्ष होते. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदासाठी त्यांना निमंत्रित केले गेले. पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. रामराव यांचे राजकीय कार्य विद्यार्थी दशेपासूनच सुरू झाले होते. काँग्रेसबरोबरची त्यांची बांधिलकी प्रामाणिक होती. त्यावेळचे मुंबईतील कामगार संघटनेचे बडे नेते व प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर रजनी पटेल. रामराव यांनी पटेल यांना प्रभावित केले होते. पटेल यांच्यासोबतच त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मुंबई प्रदेश काँग्रेसचे ते उपाध्यक्ष झाले. प्रचार समितीचेही ते अध्यक्ष राहिले.मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ आॅगस्ट १९६५ मध्ये लालबाग परळ भागात महाराष्ट्र हितवर्धिनी ही संस्था स्थापन केली. नोकºया तसेच सरकारी वसाहतीमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजे, परप्रांतीयांचे वर्चस्व वाढू नये अशा संस्थेच्या प्रमुख मागण्या होत्या. दत्ता नलावडे हेदेखील रामराव यांच्यासोबत होते. बाळासाहेब ठाकरेंशीही त्यांची दोस्ती झाली. मराठी माणसाची लढाऊ संघटना म्हणून शिवसेना त्यावेळी उदयास येत होती. शिवसेनेच्या स्थापनेत रामराव तसेच प्र. के. अत्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, तात्विक मतभेदावरून रामराव शिवसेनेपासून दूर गेले़ अत्रेंनीही तेच केले. पुढे आमदार कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर देसाई यांचे वकीलपत्रही रामराव यांनीच घेतले. त्यावेळी कोणत्याही वकिलाने असे धाडस दाखविले नव्हते, ही बाब येथे लक्षात घ्यावी लागेल.मुंबईतील लालबाग या साधारण वस्तीतच रामराव यांनी राहणे पसंत केले. गरिबांप्रतीची त्यांची आत्मियता यातून प्रतित होते. येथे त्यावेळी गुंडांचा धुमाकूळ चालला होता. अशावेळी गुंडविरोधी आघाडी स्थापन करण्याचे धाडसही केवळ रामराव यांनीच दाखविले. मुंबई भाडेकरू संघटनेचेही ते संस्थापक होते. खेदाची बाब म्हणजे कुठल्याही निवडणुकीत रामराव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली नाही. १९७४ आणि १९८० मध्ये मुंबईतून लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना रोझा देशपांडे आणि राम जेठमलानी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यानंतर देशभरात जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी अनेकांनी इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाची साथ सोडली. काँग्रेसची वाताहत झाली. १९७८ च्या निवडणुकांमध्ये काँगे्रसला सपाटून मार खावा लागला़ जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींविरूद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल करून त्यांना तिहार तुरुंगामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली, तेव्हा एकमेव रामराव आदिक कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांच्यासोबत होते. जनतेने १९८० मध्ये पुन्हा एकदा इंदिरा गांधींवर विश्वास दाखवत काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. राज्यातही सत्तांतर झाले. काँग्रेस पक्ष सत्तेत आला. बॅरिस्टर अंतुले यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात रामराव यांचा सन्मानाने समावेश झाला. त्यानंतर तब्बल १९९५ पर्यंत ते सातत्याने राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले. वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले, शरद पवार, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक या सर्वांच्या मंत्रिमंडळात त्यांना मानाचे स्थान मिळाले.तालुक्याच्या पातळीवर एमआयडीसी राबविण्याची कल्पना रामराव आदिकांचीच. तालुका पातळीवर शेतकरी व व्यापाºयांच्या मुलांनी लघू व मध्यम उद्योग उभारावेत, अशी त्यांची धारणा होती. एकाच कुटुंबातील एक मुलगा शेती कसेल, तर दुसºयाच्या हातात रोजगार असेल, हा एमआयडीसी स्थापनेमागचा उद्देश. उद्योगमंत्री असताना १९८३ मध्ये त्यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील एमआयडीसीचे भूमिपूजन झाले. तत्पूर्वी त्याच दिवशी वाळूज (औरंगाबाद) येथील एमआयडीसीचे भूमिपूजन करून ते हेलिकॉप्टरने श्रीरामपूरला आले होते.  राज्याची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बैैठक निर्माण करण्यात रामराव आदिक यांचा मोठा वाटा राहिला. सरकारमध्ये त्यांनी पाटबंधारे, अर्थ, उद्योग, विधी व न्याय खाते सांभाळले. रामराव हे सत्यशोधकी विचारांचे होते. राजकीय डावपेचांमध्ये त्यांना कधीही रस नव्हता. राज्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेसमध्ये दबावगट कार्यरत होते. मात्र रामराव यापासून नेहमीच लांब राहिले. ते इंदिरा गांधी यांचे एकनिष्ठ राहिले. लेखक - शिवाजी पवार ( उपसंपादक : लोकमत श्रीरामपूर कार्यालय)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत