अहमदनगर : अभियांत्रिकीसाठी जिल्हाभरातून ५ हजारांवर अर्जविक्री झाली असून, बुधवार (दि. २) अर्ज विक्रीचा शेवटचा दिवस आहे. यातील जवळपास सर्वानीच आपल्या अर्जांची पडताळणी (कन्फर्मेशन) केली असून, दि. ३ जुलै हा शेवटचा दिवस असेल. राज्यभरात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली. संबंधित एआरसी केंद्रावर विद्यार्थ्यांनी एप्लीकेशन किटसाठी गर्दी केली होती. विळद घाटातील विखे कॉलेज, विश्वभारती (सारोळा), छत्रपती शिवाजी (नेप्ती), रायसोनी (चास), प्रवरा (लोणी), संजीवनी (कोपरगाव), अमृतवाहिनी (संगमनेर), परिक्रमा (काष्टी) आदी महाविद्यालयांतील एआरसी केंद्रांवर पाच हजारांवर अर्जांची विक्री झाली आहे. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केली असून, राहिलेल्यांना ३ जुलैपर्यंत कन्फर्मेशन करता येईल. पॉलिटेक्निकसाठीची प्रक्रियाही २७ जूनपासून सुरू झाली असून, ६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज कन्फर्म करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १८ गुन्हेगार घातक
By admin | Published: July 02, 2014 12:40 AM