शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मंत्रालयाच्या आदेशाला जिल्हा परिषदेने घेतली हरकत

By admin | Updated: May 24, 2016 23:41 IST

अहमदनगर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेत जिल्हास्तरावर १२ अभियंते असतांनाही मंत्रालय पातळीवरून जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील तीन अभियंत्यांना ग्रामसडक योजनेत वर्ग करण्याचे आदेश आले होते.

अहमदनगर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेत जिल्हास्तरावर १२ अभियंते असतांनाही मंत्रालय पातळीवरून जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील तीन अभियंत्यांना ग्रामसडक योजनेत वर्ग करण्याचे आदेश आले होते. या आदेशाला जि.प. पातळीवर तीव्र हरकत घेत, जि.प.चे अभियंते वर्ग न करण्याचा निर्णय अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांना पत्र दिले आहे. याप्रश्नी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. यात १२ अभियंते आणि अन्य कर्मचारी असे २७ कर्मचारी कार्यरत आहेत. असे असतांना गेल्या आठवड्यात मंत्रालय पातळीवरून तीन अभियंत्यांना ग्रामसडक योजनेत वर्ग करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहे. वर्षभर सर्वेक्षण, नकाशे तयार करण्याचे काम ग्रामसडक योजनेतील मूळ कर्मचारी करत असून कामे मंजूर झाल्यावर जिल्हा परिषदेचे अभियंते या ठिकाणी वर्ग करण्यात येत आहेत. हा प्रकार ग्रामसडक योजनेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.यापूर्वी जिल्हा परिषद पातळीवर या अभियंत्यांना ग्रामसडक योेजनेत वर्ग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर या शाखा अभियंत्यांना मुंबईतून ग्राममध्ये वर्ग करण्याचे आदेश आले होते. या प्रकारामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नगरचे ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी अधीक्षक अभियंत्यांना पत्र देवून आमची यंत्रणा काम करण्यास सक्षम आहे. जिल्हा परिषदेकडील कर्मचारी वर्ग न करण्याच्या सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही आदेश आले आहे. मंगळवारी अध्यक्षा गुंड यांनी जि.प.चे कर्मचारी न सोडण्याचा ठराव झालेला असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचे कर्मचारी जि.प.मध्येच काम करतील, असा निर्णय घेतला असून त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट पत्र दिले आहे. (प्रतिनिधी)