शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा परिषद :जिल्ह्यातील ५२९ शाळा खोल्या पाडण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:05 IST

जिल्हा परिषदेच्या मोेडकळीस आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्या पाडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १६५ प्राथमिक शाळांमधील ५२९ वर्ग खोल्या पाडण्यात येणार आहेत,

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मोेडकळीस आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्या पाडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १६५ प्राथमिक शाळांमधील ५२९ वर्ग खोल्या पाडण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली़जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळा खोल्या धोकायदायक अवस्थेत असून, त्या पाडून नवीन वर्ग खोल्या बांधणे आवश्यक आहे़ या वर्ग खोल्या बांधण्यासाठी सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषदेने साई संस्थानकडे निधीची मागणी केली होती़ शिर्डीच्या साईबाबा संस्थानने या वर्ग खोल्या बांधण्यासाठी ३० कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली होती़ त्यानुसार पहिल्या टप्यात १५९ वर्ग खोल्या बांधण्यासाठी साई संस्थानने जिल्हा परिषदेच्या खात्यात १० कोटी रुपये वर्गही करण्यात आले होते़मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकायदायक शाळा खोल्या पाडण्याचा प्रस्ताव मंजूर केला नसल्यामुळे या शाळा खोल्या पाडण्याचे काम थांबले होते़ त्यावरुन जिल्हा परिषदेच्या सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जी़ एस़ मोहिते यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह सदस्यांनी चांगलेच फैलावर घेतले होते़ त्यानंतर धोकादायक शाळा खोल्या पाडण्याचे प्रस्ताव मोठ्या संख्येने मंजूर करण्यात आले आहेत़ मंजूर प्रस्तावानुसार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना, गटविकास अधिकाऱ्यांना या शाळा खोल्या पाडण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत़फेबु्रवारी महिन्यात ३६५ खोल्या पाडण्याचे आदेश१९ डिसेंबर २०१८ ते २४ जानेवारी २०१९ पर्यंत १११ खोल्या पाडण्याचे आदेश दिले होते़ मात्र, जिल्हा परिषदेच्या सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव अडविल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर केले़ फेबु्रवारी महिन्यात ३६५ वर्ग खोल्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर होऊन या खोल्या पाडण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले़ मार्च महिन्यात ५३ वर्ग खोल्या पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत़खोल्या पाडणार; पण बांधणार कशा?धोकादायक शाळा खोल्या पाडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे़ मात्र, या शाळा खोल्या पाडल्यानंतर त्या बांधायच्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शाळा खोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधी नाही़ सरकारही निधी द्यायला तयार नाही़ तर शिर्डी संस्थानकडून ३० कोटींपैकी २० कोटी मिळणार आहेत़ मात्र, शिर्डी संस्थानने निधी वाटू नये, असा न्यायालयाचा आदेश असल्यामुळे तो निधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे़ त्यामुळे या खोल्या पाडल्यानंतर त्या बांधायच्या कशा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद