शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:30 IST

अहमदनगर: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आॅनलाईन होणार आहेत़ निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे

अहमदनगर: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पुढीलवर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आॅनलाईन होणार आहेत़ निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे व नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, आदी कामकाज आॅनलाईन प्रक्रियेव्दारे करण्यात येणार असून, यासंदर्भात मंत्रालयात खास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे़ प्रशिक्षणासाठी दोन मास्टर ट्रेनर पाठविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दिल्या आहेत़ जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे़ या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे गुरुवारी निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला़ आॅनलाईन निवडणूक प्रकियेबाबत यावेळी चर्चा झाली़ निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणूक आॅनलाईन घेण्यासाठी आग्रही आहे़ त्यासाठी खास प्रणालीदेखील विकसित करण्यात आली़ या प्रणालीबाबत येत्या २१ जुलै रोजी मंत्रालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहेत़ प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्त अधिकाऱ्यांची नावे यावेळी कळविण्यात आली़ महाआॅनलाईन ने विकसित केलेल्या प्रणालीबाबत जिल्ह्यातील दोन मास्टर ट्रेनरला प्रशिक्षण दिले जाईल़ ते ही माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांना देतील आणि कर्मचारी प्रत्यक्षात कार्यवाही करतील, त्यावर मास्टर ट्रेनरचे नियंत्रण राहिल, अशी ही संकल्पना आहे़ त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य निवडणूक आयोग, यांच्याशी हे मास्टर ट्रेनर समन्वय ठेवतील़ जिल्ह्यात ही प्रकिया पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही मास्टर ट्रेनरला देण्यात आले आहेत़जिल्हा परिषदेची आगामी निवडणुकांसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे़ त्यानुसार नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ८ हजार ६३९ एवढी आहे़ ही लोकसंख्या राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे़ प्राप्त लोकसंखेच्या आधारे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या सर्वप्रथम राज्य निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाईल़ सदस्य संखेच्या आधारे जिल्ह्यातील गट व गणांची फेररचना करण्यात येणार आहे़ त्यानंतर आरक्षण सोडत होईल. (प्रतिनिधी)