शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

जिल्हा परिषदेच्या ९० कामांचे प्रस्ताव नियोजनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:48 IST

अहमदनगर: जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करून जिल्हा वार्षिक योजनेच्या (५०५४) निधीवर दावा ठोकला आहे़ सप्टेंबर अखेरीस होणाºया नियोजन समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार असून, पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, यावर कामांचे भवितव्य अवलंबून आहे़

अहमदनगर: जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करून जिल्हा वार्षिक योजनेच्या (५०५४) निधीवर दावा ठोकला आहे़ सप्टेंबर अखेरीस होणाºया नियोजन समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार असून, पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, यावर कामांचे भवितव्य अवलंबून आहे़जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्ते विकासाचा ( ५०५४) निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्याचा आदेश आहे़ असे असले तरी निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच खर्च होतो़ जिल्हा परिषदेच्या हक्काचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला पाहिजे, अशी जिल्हा परिषद पदाधिकाºयांची भूमिका आहे़ याबाबत मागील सभेच्यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थित अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह पदाधिकाºयांची बैठक पार पडली़ या बैठकीदरम्यान शिंदे यांनी निधीबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र अद्याप या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही़ जिल्हा नियोजन समितीची सभा सप्टेंबर अखेरीस होण्याची शक्यता आहे़ नियोजनची ही सभा डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेने सदस्यांनी सुचविलेल्या ९० रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविले आहेत़ सुमारे २५ कोटी रकमेचे हे प्रस्ताव आहेत़ ते अंतिम मंजुरीसाठी नियोजन समितीच्या सभेत सादर होतील़ त्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाºयांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत़ गतवर्षी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्यासह पदाधिकाºयांनी याच निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती़ मात्र निधी मिळाला नाही़ यंदा जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊन अध्यक्ष पद काँग्रेसकडे आले आहे़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडून वार्षिक योजनेतील निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे़ सदस्यांनी कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत़ निवडणुकीनंतर पहिलाच प्रस्ताव सदस्यांनी दाखल केला असून, त्यांची भिस्त विखे यांच्यावरच आहे़ अध्यक्षा शालिनी विखे याबाबत काय भूमिका घेतात़ पालकमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाल्याचे समजते़ पालकमंत्र्यांनी निधी देण्याचे कबूल केले आहे़ प्रत्यक्षात मात्र याबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने या प्रस्तावाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़ ़़़़ असे आहेत प्रस्ताव- नेवासे-९, राहुरी-७, श्रीरामपूर-७, शेवगाव-७, श्रीगोंदा-७, राहाता-१०, अकोले-१०, संगमनेर-१०, कोपरगाव-७, नगर-७, जामखेड-२, पाथर्डी-५, कर्जत-४, पारनेर-७़़़़़