शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

येळकोट येळकोट जय मल्हार....कोरोना होऊ दे हद्दपार, राहुरीच्या खंडोबा यात्रेची दोनशे वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:32 IST

राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांची यात्रा उत्सव परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. कोरानाचे सावट असल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला कुलूप लावून बंद करण्यात आले. इतिहासात प्रथमच दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा खंडित झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, कोरोना होऊ दे हद्दपार, अशीच याचना ग्रामस्थांनी केली.

राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांची यात्रा उत्सव परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. कोरानाचे सावट असल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला कुलूप लावून बंद करण्यात आले. इतिहासात प्रथमच दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा खंडित झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, कोरोना होऊ दे हद्दपार, अशीच याचना ग्रामस्थांनी केली.आज रविवारी राहुरीचे ग्रामदैवत खंडोबाची यात्रा म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र संचारबंदी असल्यामुळे भाविक मंदिराकडे फिरकले नाहीत. घरी बसून येळकोट जय मल्हार म्हणत भाविकांनी यंदा घरीच यात्रा साजरी केली. यात्रा उत्सवाच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा खंडित झाल्याचे समोर आले आहे. राहुरीच्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक दरवर्षी हजेरी लावत असतात. माणसांनी भरलेल्या बारागाड्या ओढण्याची परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे. कुस्तीच्या हंगामाला ही पहिलवान हजेरी लावत असतात.कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा उत्सव भरणार नसल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार आज रविवारी यात्रा संपन्न झाली नाही. भाविकांनी घरी खंडोबाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. भाविकांनी घरी राहूनच खंडोबाचे दर्शन घ्यावे,असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत घरीच यात्रा साजरी केली. त्यामुळे अनेक पिढ्यांची यात्रा भरण्याची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले. राहुरी येथे जुने मंदिर होते. दांशुर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर दहा वषार्पूर्वी मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धा करण्यात आला होता.---खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने बैठकीमध्ये यात्रा भरण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र कुणाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सर्वांनी घरी बसूनच यात्रा उत्सव साजरा करावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यात्रा कमिटीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व भाविकांची मन:पूर्वक आभार. पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता.