शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

‘राहुरी’च्या कामगारांचे धरणे

By admin | Updated: July 19, 2024 14:03 IST

अहमदनगर : राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी थकीत पगारासाठी नगरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले.

अहमदनगर : राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी थकीत पगारासाठी नगरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तीन दिवसात कामगारांच्या पगारासाठी संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्य साखर कामगार संघटनेचे सचिव कॉ. आनंद वायकर यांनी दिली. राहुरी साखर कारखान्याच्या कामगारांचा पगार ३८ महिन्यांपासून थकलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वेळोवेळी कामगारांच्या पगारासाठी रक्कम मिळूनही कामगारांच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीची रक्कमही व्यवस्थापनाने भरलेली नाही. सहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युईटीची रक्कम संबंधितांना मिळालेली नाही. साखर कामगारांच्या वेतन व सेवा शर्तीसाठी नेमलेल्या शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे २००७ च्या कराराप्रमाणे १५ टक्के फरकाची उर्वरित रक्कम व जुलै २०११ मध्ये नेमलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे १८ टक्के फरकाची रक्कम व्यवस्थापनाने कामगार संघटनेबरोबर करार करूनही दिलेली नाही. हंगामी कामगारांचा दोन हंगामाचा रिटेन्शन भत्ता वेळोवेळी मागणी करूनही व्यवस्थापनाने दिलेला नाही. कामगारांच्या पगारातून कपात केलेली पतपेढीची रक्कमही व्यवस्थापनाने पतपेढीकडे भरणा केली नाही. ही रक्कम ४ कोटी ७५ लाख असून थकीत पगाराची रक्कम ३९ कोटी असून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम २ कोटी ४५ लाख रुपये आहे. अन्य देण्यांसह कामगारांचे देणे ५९ कोटी आहे. हे देणे तातडीने मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य साखर फेडरेशनचे सचिव बबनराव पवार यांनी केले. यावेळी अप्पासाहेब गावडे, बाळासाहेब म्हस्के, सुधीर आहेर, सुरेश थोरात, सोमनाथ वाकडे, सुधीर कराळे, सोमनाथ वाकडे, कारभारी खुळे, चंद्रकांत कराळे आदी सहभागी झाले. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगारांच्या पगारासाठी संचालक मंडळावर तीन दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. देणी देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक राहुरी : शेतकरी व कामगारांची देणी देण्यासंदर्भात संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली. आर्थिक संकटात सापडलेल्या तनपुरे साखर कारखान्याला बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत़ ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांची देणी थकल्यामुळे कारखान्यापुढे पेच निर्माण झाला आहे़ यासंदर्भात उपाध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे़ कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत़ संचालक मंडळाला बरोबर घेऊन यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सुरेश वाबळे यांनी सांगितले़ कर्ज उपलब्ध व्हावे यासंदर्भात अजून संचालक मंडळाची बैठक झालेली नाही़ अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल, असे वाबळे यांनी स्पष्ट केले. विश्रामगृहावर संचालक मंडळाचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. ती बैठक नव्हती. त्यानिमित्त अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्याशी संवाद साधला़ कारखान्याला उस उत्पादक व कामगारांचे देणे आहे़ साखर शिल्लक नाही, मग एवढी रक्कम देणार कशी, अशी विचारणा तनपुरे यांना केली़ - शिवाजीराव गाडे, विरोधी संचालक, तनपुरे कारखाना