शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘राहुरी’च्या कामगारांचे धरणे

By admin | Updated: July 19, 2024 14:03 IST

अहमदनगर : राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी थकीत पगारासाठी नगरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले.

अहमदनगर : राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी थकीत पगारासाठी नगरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तीन दिवसात कामगारांच्या पगारासाठी संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्य साखर कामगार संघटनेचे सचिव कॉ. आनंद वायकर यांनी दिली. राहुरी साखर कारखान्याच्या कामगारांचा पगार ३८ महिन्यांपासून थकलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वेळोवेळी कामगारांच्या पगारासाठी रक्कम मिळूनही कामगारांच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीची रक्कमही व्यवस्थापनाने भरलेली नाही. सहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युईटीची रक्कम संबंधितांना मिळालेली नाही. साखर कामगारांच्या वेतन व सेवा शर्तीसाठी नेमलेल्या शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे २००७ च्या कराराप्रमाणे १५ टक्के फरकाची उर्वरित रक्कम व जुलै २०११ मध्ये नेमलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे १८ टक्के फरकाची रक्कम व्यवस्थापनाने कामगार संघटनेबरोबर करार करूनही दिलेली नाही. हंगामी कामगारांचा दोन हंगामाचा रिटेन्शन भत्ता वेळोवेळी मागणी करूनही व्यवस्थापनाने दिलेला नाही. कामगारांच्या पगारातून कपात केलेली पतपेढीची रक्कमही व्यवस्थापनाने पतपेढीकडे भरणा केली नाही. ही रक्कम ४ कोटी ७५ लाख असून थकीत पगाराची रक्कम ३९ कोटी असून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम २ कोटी ४५ लाख रुपये आहे. अन्य देण्यांसह कामगारांचे देणे ५९ कोटी आहे. हे देणे तातडीने मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य साखर फेडरेशनचे सचिव बबनराव पवार यांनी केले. यावेळी अप्पासाहेब गावडे, बाळासाहेब म्हस्के, सुधीर आहेर, सुरेश थोरात, सोमनाथ वाकडे, सुधीर कराळे, सोमनाथ वाकडे, कारभारी खुळे, चंद्रकांत कराळे आदी सहभागी झाले. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगारांच्या पगारासाठी संचालक मंडळावर तीन दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. देणी देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक राहुरी : शेतकरी व कामगारांची देणी देण्यासंदर्भात संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली. आर्थिक संकटात सापडलेल्या तनपुरे साखर कारखान्याला बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत़ ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांची देणी थकल्यामुळे कारखान्यापुढे पेच निर्माण झाला आहे़ यासंदर्भात उपाध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे़ कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत़ संचालक मंडळाला बरोबर घेऊन यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सुरेश वाबळे यांनी सांगितले़ कर्ज उपलब्ध व्हावे यासंदर्भात अजून संचालक मंडळाची बैठक झालेली नाही़ अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल, असे वाबळे यांनी स्पष्ट केले. विश्रामगृहावर संचालक मंडळाचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. ती बैठक नव्हती. त्यानिमित्त अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्याशी संवाद साधला़ कारखान्याला उस उत्पादक व कामगारांचे देणे आहे़ साखर शिल्लक नाही, मग एवढी रक्कम देणार कशी, अशी विचारणा तनपुरे यांना केली़ - शिवाजीराव गाडे, विरोधी संचालक, तनपुरे कारखाना