शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. त्यापैकी २. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. त्यापैकी २. ५ किलोमीटर अंतर हे पुलांचे आहे. सध्या १८ किलोमीटरचे मातीचा भरावाचे काम सुरू आहे. ६.५ किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटच्या एका थराचे काम झाले असून अंतिम थर बाकी आहे. तर ३ किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटच्या अंतिम थरासह काम पूर्ण झाले आहे.

या ३० किलोमीटरदरम्यान लहान – मोठे असे एकूण १३७ पूल आहेत. त्यापैकी सर्वांत मोठे दोन इंटरचेज आहेत. तसेच गोदावरी नदी, कोळ नदी, खडकी नदी, मनमाड – दौंड रेल्वेमार्ग, चांदेकसारे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन, देर्डे- कोऱ्हाळे येथे दोन असे एकूण आठ मोठे उड्डाणपूल आहेत. तसेच दहा गावांतील महत्त्वाची रहदारी असलेल्या स्थानिक रस्त्यासाठी एकूण २७ लहान पूल आहेत. तर प्राण्यासाठी, पाट, चाऱ्या, शेतकऱ्यांसाठी, पाईपलाईनसाठी, १०० बोगदे असून सर्वाचे काम सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे, घारी, डाऊचबू, चांदेकसारे, जेऊरकुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे व धोत्रे या दहा गावांतून समृद्धी महामार्ग जातो.

जागतिक दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डीसाठी नगर- मनमाड महामार्गावर कोकमठाण शिवारात तीनचारी येथे ३०० एकरमध्ये सर्वात मोठे इंटरचेंजेस असून त्याच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

धोत्रे येथे छोट्या स्वरूपात इंटरचेंज असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच याच गावात स्मार्टसिटी होणार आहे.

१ मे २०२१ पर्यंत नागपूर -शिर्डीदरम्यान महामार्ग सुरू करण्यासाठी धोत्रे येथील इंटरचेंज येथून वाहने खाली उतरून जुन्या मुंबई - नागपूर महामार्गाला जोडून शिर्डीकडे जाता येणार आहे. त्यासाठीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

.....................

फोटोओळी –

कोपरगाव तालुक्यात नगर – मनमाड महामार्गावरील कोकमठाण शिवारात तीनचारी येथे इंटरचेंजेसच्या सर्वात मोठ्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.