शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिराची कामे ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:25 IST

संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी नेवासा येथील अमृतवाहिनी प्रवरेकाठी असलेल्या मंदिरातील पैस खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरी सांगितली. याच पवित्र भूमीवर पूर्वी करवीरेश्वराचे मंदिर होते. त्याच मंदिरातील खांबाला (पैस) टेकून संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ग्रंथांची निर्मिती केली. जगाला दिव्य संदेश देणारा पैस खांब आजही अबाधित आहे. नेवासा वारकरी संप्रदायाचे हे आदिपीठ असले तरी अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकासाबाबत दुर्लक्षितच आहे.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ सुहास पठाडे़/  नेवासा : संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी नेवासा येथील अमृतवाहिनी प्रवरेकाठी असलेल्या मंदिरातील पैस खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरी सांगितली. याच पवित्र भूमीवर पूर्वी करवीरेश्वराचे मंदिर होते. त्याच मंदिरातील खांबाला (पैस) टेकून संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ग्रंथांची निर्मिती केली. जगाला दिव्य संदेश देणारा पैस खांब आजही अबाधित आहे. नेवासा वारकरी संप्रदायाचे हे आदिपीठ असले तरी अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकासाबाबत दुर्लक्षितच आहे.संत ज्ञानेश्वर मंदिराचा पंढरपूर, देहू, आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश आहे. समावेश झाल्यापासून १५ कोटीच्या आसपास निधी मंजूर झाला. मात्र एक दोन कामे वगळता ठोस अशी कामे झालेली नाहीत. मागील तीन वर्षांपासून ही कामे पूर्णपणे ठप्प आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वर्षभर हजारों वारकरी, दर्शनासाठी येतात. आषाढी वद्य व कार्तिकी वद्य एकादशीला या ठिकाणी राज्यातून लाखों भाविक येतात. दरवर्षी या मार्गावरून आळंदी, पंढरपूरकडे जाणा-या वारक-यांच्या अनेक दिंड्या माउलींच्या दर्शनासाठी येतात. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे. ज्ञानेश्वर मंदिर रस्ता, सुविधा केंद्र, उद्यानाची कामे काही प्रमाणात झाली आहेत. रस्त्यावर दुभाजक, सोलर विद्युतीकरण (पथदिवे), पथरस्ता व संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट, ज्ञानेश्वरीवर आधारित चित्रे, ध्वनिफित ही प्रकल्पाची महत्त्वाची मंदिर व शहराच्या विकासाला चालना देणारी कामे रखडली आहेत. तीर्थक्षेत्र विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. उद्यानातील पथदिव्यांची काही महिन्यांपूर्वी मोडतोड झाली आहे. उद्यानात तयार असलेल्या नऊ चौथºयांवर माउलीच्या जीवनपटावरील घटनाशिल्पे साकारण्यात येणार होती. त्याचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. संरक्षणभिंतीसह सुरक्षारक्षकाची अत्यंत गरज या उद्यानाच्या रक्षणासाठी असली तरी याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रकल्पातील रखडलेल्या कामाची माहिती घेऊन उद्यानासह रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मागील वर्षी दिलेल्या भेटी दरम्यान दिले होते. मात्र त्यानंतरही काम सुरू झाले नाही. सदरचे रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराची चौकशी झाली व त्याच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल १० लाख रुपये दंड या ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र ठप्प झालेले कामे केव्हा आणि कशी पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे.माहिती मिळत नसल्याची विश्वस्त मंडळाची तक्रारतीर्थविकास कामांबाबत आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व माहिती संस्थानला दिली जात नाही. कुठल्या कामाला किती निधी आहे हे काही कळत नाही. तसेच अधिकारी ही कामाकडे लक्ष देत नाही. तसेच उद्यानातील संरक्षण भिंत त्वरित उभारावी, अशी मागणी मागील वर्षापासून विश्वस्त मंडळ करत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर