शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बाबुर्डीत जमिनीच्या वादातून महिला सरपंचांना कुर्‍हाडीने मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 17:52 IST

पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

पळवे (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत आशा सुभाष दिवटे यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुर्डी येथील गवळी-दिवटे  यांच्यात अनेक वर्षांपासून जमीनीचा वाद आहे. ग्रामस्थांनी हा वाद बऱ्याच वेळा पंचकमिटी समोर ठेवला. मात्र वाद मिटू शकला नसल्याने त्यांचे रूपांतर रविवारी काठ्या कुर्‍हाडीने मारहाणीत झाले.

याबाबत सुपा पोलीस स्टेशन वरून  मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.१५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आशा दिवटे यांनी बांधावरील झाड का पेटवून दिले असे विचारले असता सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस  त्यांच्या पतीस व सासू ठकूबाई मारुती दिवटे यांना काठी व कुर्‍हाडीने मारहाण करत जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. यावरून बाळू विठोबा गवळी, संगीता बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, महेश बाळू गवळी, रीना महेश गवळी, प्रियंका निलेश गवळी सर्व रा.बाबुर्डी ता.पारनेर या सहा जणांविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक बळप नेमणूक पारनेर पोलीस स्टेशन (अतिरिक्त कार्यभार सुपा पोस्ट), सहाय्यक पोलिस निरीक्षक कोसे, पोहे कॉन्स्टेबल आर. एस. पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.    पोलिसांकडून दंडीलशाहीआरोपी यांनी मारहाण करण्याअगोदर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर  आमच्या कुटुंबातील सदस्यांना कुर्‍हाडी ने मारहाण केली. यापूर्वी देखील सासूबाईंना मारहाण करण्यात आला आहे. आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता ते नातेवाईक आहेत.असे म्हणत आमच्यावर मोठ्या आवाजात बोलू लागले.घटना स्थळी जाऊन देखील कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.तक्रारीची दखल न घेतल्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे.- आशा दिवटे, माजी सरपंच बाबुर्डी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी