शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाबुर्डीत जमिनीच्या वादातून महिला सरपंचांना कुर्‍हाडीने मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 17:52 IST

पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

पळवे (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत आशा सुभाष दिवटे यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुर्डी येथील गवळी-दिवटे  यांच्यात अनेक वर्षांपासून जमीनीचा वाद आहे. ग्रामस्थांनी हा वाद बऱ्याच वेळा पंचकमिटी समोर ठेवला. मात्र वाद मिटू शकला नसल्याने त्यांचे रूपांतर रविवारी काठ्या कुर्‍हाडीने मारहाणीत झाले.

याबाबत सुपा पोलीस स्टेशन वरून  मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.१५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आशा दिवटे यांनी बांधावरील झाड का पेटवून दिले असे विचारले असता सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस  त्यांच्या पतीस व सासू ठकूबाई मारुती दिवटे यांना काठी व कुर्‍हाडीने मारहाण करत जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. यावरून बाळू विठोबा गवळी, संगीता बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, महेश बाळू गवळी, रीना महेश गवळी, प्रियंका निलेश गवळी सर्व रा.बाबुर्डी ता.पारनेर या सहा जणांविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक बळप नेमणूक पारनेर पोलीस स्टेशन (अतिरिक्त कार्यभार सुपा पोस्ट), सहाय्यक पोलिस निरीक्षक कोसे, पोहे कॉन्स्टेबल आर. एस. पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.    पोलिसांकडून दंडीलशाहीआरोपी यांनी मारहाण करण्याअगोदर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर  आमच्या कुटुंबातील सदस्यांना कुर्‍हाडी ने मारहाण केली. यापूर्वी देखील सासूबाईंना मारहाण करण्यात आला आहे. आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता ते नातेवाईक आहेत.असे म्हणत आमच्यावर मोठ्या आवाजात बोलू लागले.घटना स्थळी जाऊन देखील कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.तक्रारीची दखल न घेतल्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे.- आशा दिवटे, माजी सरपंच बाबुर्डी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी