शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

विनाअनुदानित शाळांबाबत ४ डिसेंबरचा अध्यादेश मागे घ्या

By | Updated: December 6, 2020 04:21 IST

अहमदनगर : मागील दोन वर्षांपूर्वी ज्या विनाअनुदानित शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र होत्या, त्यांना अनुदान देण्याऐवजी पुन्हा त्या शाळांचे ...

अहमदनगर : मागील दोन वर्षांपूर्वी ज्या विनाअनुदानित शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र होत्या, त्यांना अनुदान देण्याऐवजी पुन्हा त्या शाळांचे फेर मूल्यांकन करण्याबाबत ४ डिसेंबर २०२० रोजी काढलेला अध्यादेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा पहिला टप्पा दिला. त्यानंतर पुढील टप्पा मार्च २०१९ ला देणे गरजेचे असताना शासनाने स्वेच्छाधिकार म्हणून हा टप्पा नाकारला व आता पुन्हा या शाळांचे फेर मूल्यांकन करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाला शिक्षक भारतीचा विरोध असून, नियमानुसार अनुदानाचा पुढील टप्पा फेर मूल्यांकन न करता देणे गरजेचे आहे.

याशिवाय ज्या शाळांचे आधीच मूल्यांकन करून शासनाने वेतन अनुदान देण्याचे मान्य केले होते, त्या शाळांना अनुदान देण्याऐवजी पुन्हा या शाळांचे मूल्यांकन करण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. एकदा मूल्यांकन झालेले असताना फेर मूल्यांकनाची आवश्यकता नाही. शासनाने आदेश काढला असून, यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश मागे घ्यावा यासाठी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

हा अध्यादेश मागे घेण्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, संतोष मगर, संजय तमनर, संतोष देशमुख, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, संभाजी चौधरी, किसन सोनवणे, कैलास जाधव, कारभारी आवारे, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.