शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांबाबत ४ डिसेंबरचा अध्यादेश मागे घ्या

By | Updated: December 6, 2020 04:21 IST

अहमदनगर : मागील दोन वर्षांपूर्वी ज्या विनाअनुदानित शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र होत्या, त्यांना अनुदान देण्याऐवजी पुन्हा त्या शाळांचे ...

अहमदनगर : मागील दोन वर्षांपूर्वी ज्या विनाअनुदानित शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र होत्या, त्यांना अनुदान देण्याऐवजी पुन्हा त्या शाळांचे फेर मूल्यांकन करण्याबाबत ४ डिसेंबर २०२० रोजी काढलेला अध्यादेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.

शासनाने सप्टेंबर २०१८ मध्ये विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा पहिला टप्पा दिला. त्यानंतर पुढील टप्पा मार्च २०१९ ला देणे गरजेचे असताना शासनाने स्वेच्छाधिकार म्हणून हा टप्पा नाकारला व आता पुन्हा या शाळांचे फेर मूल्यांकन करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाला शिक्षक भारतीचा विरोध असून, नियमानुसार अनुदानाचा पुढील टप्पा फेर मूल्यांकन न करता देणे गरजेचे आहे.

याशिवाय ज्या शाळांचे आधीच मूल्यांकन करून शासनाने वेतन अनुदान देण्याचे मान्य केले होते, त्या शाळांना अनुदान देण्याऐवजी पुन्हा या शाळांचे मूल्यांकन करण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. एकदा मूल्यांकन झालेले असताना फेर मूल्यांकनाची आवश्यकता नाही. शासनाने आदेश काढला असून, यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश मागे घ्यावा यासाठी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

हा अध्यादेश मागे घेण्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, संतोष मगर, संजय तमनर, संतोष देशमुख, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, संभाजी चौधरी, किसन सोनवणे, कैलास जाधव, कारभारी आवारे, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.