शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

केडगावच्या पोलीस ठाण्याला मुहूर्त मिळणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 09:45 IST

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव्यस्थेचे सर्वत्र धिंडवडे निघाले. नगर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे केडगावसह आसपासच्या काही गावांचे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या १८ वर्षांपासून राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याभावी धूळखात पडून आहे.

ठळक मुद्दे १८ वषार्पासूनचा प्रस्ताव गुन्हेगारी, गुंडगिरीचा कळस राजकीय व प्रशासकीय अनास्था

योगेश गुंडकेडगाव : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव्यस्थेचे सर्वत्र धिंडवडे निघाले. नगर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे केडगावसह आसपासच्या काही गावांचे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या १८ वर्षांपासून राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याभावी धूळखात पडून आहे.केडगावचा वाढता पसारा, गुन्हेगारी,राजकीय संवेदनशीलता, अवैध धंद्याचा बोलबाला, राज्यमार्ग, बाह्यवळण रस्ता यामुळे केडगाव उपनगराला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा मिळणे आवश्यक असूनही हा प्रश्न वषार्नुवर्षे थिजत पडला आहे. सुमारे ८० हजार लोकवस्तीचे नगर शहराचे उपनगर असणारे केडगाव आता झपाट्याने विस्तारत आहे. सन २००० मध्ये केडगावसह आसपासची नगर तालुक्यातील गावे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला. याला आता १८ वर्षे लोटली आहेत. यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आले. केडगावच्या प्रस्तावाची फक्त चर्चाच झाली. राजकीय पाठपुराव्याचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरील ढिलाई यामुळे अजूनही हा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. सध्या केडगाव नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचा विस्तार वाढत असून जवळपास निम्मे शहर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट आहे. यामुळे कोतवाली पासून ५ किलोमीटर अंतरावर असणा-या केडगावमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मर्यादा येत आहेत. केडगाव मध्ये पोलीस चौकी असून तेथे चार-पाच पोलीस कर्मचा-याची नेमणूक आहे. यामुळे एवढ्या मोठ्या भागातील गुन्हेगारीवर वचक ठेवणे जिकीरीचे बनत आहे. राजकीयदृष्ट्या केडगाव नेहमी संवेदनशील म्हणून ओळखले जाते. निवडणुकीच्या काळात अनेक वेळा तणावाची स्थिती येथे पाहवयास मिळते. यातून अनेकदा हाणामारी झालेल्या आहेत. आताच घडलेले दुहेरी हत्याकांड हे ही याच कारणांनी घडल्याचे समोर येत आहे. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. राज्य मार्ग व बाह्यवळण रस्ता या परिसरातून जात असल्याने अपघात आणि रस्तालूट यांच्या गुन्ह्यांची आकडेवारी आता वाढू लागली आहे. यासर्व परिस्थितीमुळे केडगाव सारख्या उपनगरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात येणे आवश्यक असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडत पडला आहे.

इतर उपनगरात पोलीस ठाणे केडगावात का नाही ?नगर शहराच्या भिंगार, सावेडी, नागापूर या उपनगरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आहे. मात्र केडगाव झपाट्याने वाढत असताना या उपनगराचा समावेश अजून शहरातील पोलीस ठाण्यात आहे. शहर व केडगाव मधील अंतर आणि शहराच्या पोलीस ठाण्याचा वाढता आवाका पाहता केडगावलासुध्दा इतर उपनगरांप्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी मागणी होऊ लागली आहे.

म्हणून तरी पोलीस पोहचले लवकरकेडगावमध्ये ज्या दिवशी दुहेरी हत्याकांड झाले त्या दिवशी येथील पोटनिवडणुकीचा निकाल होता. यामुळे केडगाव पोलीस चौकीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची मोठी कुमक होती. यामुळे घटना घडल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले. अन्यथा नगर शहरातून पोलीस येण्यात बराच वेळ गेला असता.

प्रथमच केडगाव चौकित फिर्याद दाखलकेडगाव दुहेरी हत्याकांड झाल्यांनतर प्रथमच येथील पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा स्वत: उपस्थित होते. यापूर्वी फिर्याद देण्यास कोतवाली पोलीस ठाणे गाठावे लागायचे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड