शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शाळांवरील वीज बिलाचा भार उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:50 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या असून, विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़. मात्र, या वाढलेल्या वीज बिलाच्या भारामुळे शाळांचे कंबरडे मोडले आहे़. मात्र, लवकरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींमार्फत हे वीज बिल भरले जाऊ शकते़. त्यामुळे वीज बिलाच्या भारातून शाळांची सुटका होऊ शकते़.

साहेबराव नरसाळे ।  अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या असून, विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़. मात्र, या वाढलेल्या वीज बिलाच्या भारामुळे शाळांचे कंबरडे मोडले आहे़. मात्र, लवकरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींमार्फत हे वीज बिल भरले जाऊ शकते़. त्यामुळे वीज बिलाच्या भारातून शाळांची सुटका होऊ शकते़.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे गेल्या दोन वर्षांपासून शाळांचे वीज बिल १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरले जावे, अशी मागणी होत होती़. त्यासाठी शिक्षकांकडून पाठपुरावाही सुरु होता़. शिक्षकांच्या या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे़. १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी वर्ग केला जातो़. या निधीचा विनियोग कसा करायचा, याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने ग्रामपंचायतींना लागू केल्या आहेत़. तसेच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक आराखड्यातही ग्रामपंचायतींनी शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्वाच्या बाबींवर प्राधान्याने खर्च करावा, असे सरकारने निर्देश दिलेले आहेत़. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४५ (३) मधील मार्गदर्शक तत्वांनुसार ग्रामपंचायतींना मिळणारा शासकीय निधी किंवा ग्रामपंचायतींचा स्वनिधी यातून शिक्षणावर खर्च करण्याबाबत सुचविण्यात आले आहे़. या कलमाचा आधार घेऊन ग्रामपंचायतींनी शाळांचे वीज बिल भरावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून हालचाली सुरु आहेत़. सरकारकडून शाळांना सादील निधी मिळतो़ हा निधी अत्यंत तुटपुंजा असतो़. त्यातून वीज बिल व इतर अनुषंगिक खर्च भागविणे अवघड होते़. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगातून हे वीज बिल भरल्यास विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन दर्जेदार शिक्षण घेण्याची सुविधाही अखंडित मिळू शकते़. शाळा डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून अधिक परिणामकारक अध्यापन करता येते़. मात्र, वीज बिल भरण्यासाठी शाळांना वेगळी तरतूद करण्यात आलेली नाही़. त्यामुळे डिजिटल शिक्षणात अडचणी येतात़ भरमसाट वीज बिल भरणे अवघड होते़. त्यामुळे शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे पाठपुरावा केला होता़. याबाबत जिल्हा परिषदेने सकारात्मकता दाखवून त्यासंदर्भात आदेश काढण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला केल्या आहेत, असे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.     

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAhmednagarअहमदनगर