शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मोदी पुढील पाच वर्षात देशाची वाट लावणार - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. आता यापुढे ते तेच प्रकार करणार आहेत.

जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. आता यापुढे ते तेच प्रकार करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीदिनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृतीस्तंभास अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरूण जाधव, गोपीचंद पडळकर, अविनाश शिंदे, अक्षय शिंदे उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, भाजपला हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भेले असल्याने काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतासाठी वापर केला. त्यांच्यासाठी काही केले नाही. त्यामुळे ते आता वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्ताव दिलेला नाही. दिला तरी त्यांच्याकडे जायचे कशासाठी ? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे. तो अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. भाजप- सेना व काँग्रेस राष्ट्रवादीला  पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पर्याय तयार झाला आहे. त्यामुळे आम्ही ठाम आहोत.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर