शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

लोकसहभागातून होणार गोदावरी कालव्यांचे रूंदीकरण :राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:51 IST

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या रूंदीकरणाची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या रूंदीकरण मोहिमेचा कृती आराखडा १५ जानेवारीपर्यंत तयार करावा, अशा सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केल्या.

शिर्डी : शंभर वर्षे पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या रूंदीकरणाची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या रूंदीकरण मोहिमेचा कृती आराखडा १५ जानेवारीपर्यंत तयार करावा, अशा सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केल्या.जलसंपदा विभाग, टाटा इन्स्टिटयुटची सेवाभावी संस्था, नाम फाउंडेशन यांच्यासह गावपातळीवरील संस्था आणि शेतकऱ्यांचा सहभाग असलेली गोदावरी कालव्यांची रूंदीकरण मोहीम विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख पदाधिकारी, शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह टाटा व नाम फाउंडेशनच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी विश्रामगृहात गुुरुवारी बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, पोलीस उप अधीक्षक अभिजित शिवतारे, अभियंता कासम गुट्टुवार, नाम फाउंडेशनचे संदीप काकडे, युवा मित्र सुनील पोटे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, उपाध्यक्ष प्रताप जगताप, मोहनराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कॉँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, राजेंद्र लहारे, डॉ. धनंजय धनवटे, वाल्मिक गोर्डे, राजेंद्र कार्ले, आदी उपस्थित होते.शेवटच्या शेतकºयाला आवर्तनचा लाभ मिळावा हा माझा वैयक्तिक प्रयत्न असतो. पण कालव्यांची झालेली दुरवस्था, कालव्यांलगत असलेली बाभळीची झाडे आणि कालव्यांच्या वहन मार्गात असलेले अनावश्यक अडथळे आवर्तनात व्यत्यय ठरतात, असे नमूद करून विखे म्हणाले की, कालवे शंभर वर्षांचे आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी व रूंदीकरणासाठी शासनाकडे निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी सातत्याने करत आहोत, पण निधी उपलब्धतेच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी लक्षात घेता लाभक्षेत्रातील सहकारी सेवाभावी संस्था आणि शेतकºयांच्या सहभागातून कालव्यांच्या रूदीकरणांची मोहीम हाती घेण्याशिवाय पर्याय नाही. यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी नाबार्डच्या माध्यमातून या कालव्यांच्या कामांकरीता निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आवश्यक निधीची उपलब्धता झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर