शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काही वेळ का होईना, पण बाजारपेठ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

अहमदनगर : नगर शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करून वेळेचे बंधन पाळून बाजारपेठ ...

अहमदनगर : नगर शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करून वेळेचे बंधन पाळून बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बुधवारी पाठविले.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनचा कालावधी संपला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. असे असताना कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांची नगरशी तुलना केली जात असून, आकडेवारीनुसार लाॅकडाऊन वाढवून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगर शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण रोजीरोटीपुरते देखील कमवायची सोय राहिलेली नाही. तसेच दुकानांमध्ये पाऊस, उंदीर, धुळीमुळे, शॉर्टसर्किटमुळे काही दुर्घटना किंवा नुकसान होते आहे का? हे पाहण्यासाठी दुकान उघडले तरी व्यापाऱ्यांना दंड केला जात आहे.

कोरोनाच्या महामारीत उद्योगधंदे, पैसापाणी याला दुय्यम स्थान आहे. त्यासाठी शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन व्यापारी करतील. आम्हा व्यापाऱ्यांना देखील पोट आहे, कुटुंब आहे, मुलंबाळं आहेत. त्यांची व आमच्या आरोग्याची काळजी देखील आहे. म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून आम्हाला परवानगी द्यावी, असे आमचे मुळीच म्हणणे नाही. परंतु, वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. मागील एका आठवड्यापासून नगरमध्ये रुग्णसंखेत घट होत असून, दररोज ५० ते ८० रुग्ण आढळून येत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. ऑक्सिजन बेडची टक्केवारी उपलब्धता ठरवताना इतर मोठ्या शहरांशी नगरची तुलना होऊ शकत नाही. याशिवाय २० ते २५ टक्के नागरिकांचे लसीकरणही झाले आहे.

वस्तुस्थिती लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना योग्य तो कालावधीचा निकष लावून नियमांचे काटेकोरपणे पालन करून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर अभय कोठारी, लाभेष मुथा, स्वप्निल डुंगरवाल, प्रबल पटवा, वर्धमान मुथा, नीलेश संचेती, नीलेश पोखरणा, सचिन चोपडा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

..