शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

हेल्मेटसक्ती कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:43 IST

जेव्हा सरकार खड्डे विरहीत रस्ते देऊ शकेल व कोर्ट नियम मोडणाऱ्यांवर जरब बसवेल तेव्हाच ते नागरिकांना हेल्मेट सक्तीचा आग्रह करू शकतात़

अहमदनगर : जेव्हा सरकार खड्डे विरहीत रस्ते देऊ शकेल व कोर्ट नियम मोडणाऱ्यांवर जरब बसवेल तेव्हाच ते नागरिकांना हेल्मेट सक्तीचा आग्रह करू शकतात़ नाहीतर स्वत: गोड खाणे व इतरांना ‘साखर खाऊ नको’ म्हणण्यासारखे आहे.मागील काही दिवसांपासून पाचशे वर्षांचा इतिहास असणा-या अहमदनगर शहरात मोठ्या उत्साहाने हेल्मेटसक्ती राबवली जात आहे. त्यामुळे दुकानांमधील काऊंटरवर दिसणारी हेल्मेटस् रस्त्यावर दिसू लागली आहेत आणि त्याला कारण आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला हेल्मेट वापरण्याचा आदेश. गुळगुळीत रस्ते असणाºया, नियम पाळण्याची सहज प्रेरणा असलेल्या दूर देशांमधील ही सक्ती या दोन्ही गोष्टींचा दुरान्वये संबंध नसलेल्या शहरात राबविली जात आहे.सुरक्षितता प्रदान करणारी कुठलीही गोष्ट तिच्या क्षमतेबाहेर सुरक्षितता देऊ शकत नाही. डोके आपटल्याने मृत्यूची शक्यता वाढते हे जसे खरे आहे तसेच डोक्याशिवाय असणाºया इतर शरीरभागांवर आघात झाल्याने होणारे मृत्यू सुद्धा खूप आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचा मृत्यू नेमका कशाने झालेला आहे, हे संख्यात्मकदृष्टीने तपासून मग असा आदेश काढणे जास्त बरोबर ठरले असते.हेल्मेट असतानाही मेंदू जोरात हलणे, चेहºयाला मार लागणे, मानेचा मणका सरकणे यामुळे ही हानी पोहचू शकते. मोबाईल, कॉम्प्युटरमुळे अगोदरच ताणात असणाºया मानेच्या मणक्यांवर या दीड किलोच्या अतिरिक्त भाराने ताण वाढवणे योग्य नाही. हेल्मेट, रस्त्यांवरील खड्डे व स्पीडब्रेकर या तीन गोष्टींचा संगम मानदुखीचे रुग्ण वाढवण्यात मात्र नक्की होईल.तुडूंब भरलेल्या लोकल रेल्वेमधून, शाळेच्या बसमधून, ड्रायव्हर शेजारी गिअर नॉबच्या सान्निध्यात होणारा प्रवास हा सुरक्षित नक्कीच नाही. लाखो किलोमीटर प्रवासानंतर एक व्यक्ती दगावणे या दोन वेगवेगळ्या ‘धोकापातळी’ आहेत. हेल्मेट वापरून झालेले मृत्यू, त्यात डोक्याला मार लागून झालेले, शरीर अवयवांवर आघात होऊन झालेले मृत्यू, खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू, नियम तोडून झालेले मृत्यू, रस्त्याला असलेल्या चुकीच्या धोक्याच्या वळणांनी झालेले मृत्यू असा संख्यात्मक विचार करून मग हेल्मेटची उपयुक्तता आपल्या देशात लागू होते का? हे तपासणे गरजेचे आहे.नगरमधील अरुंद गल्ल्या, अतिक्रमणांमधून अस्ताव्यस्त व अपुºया पार्किंग, वाकड्या तिकड्या उभ्या केलेल्या गाड्यांमुळे उरलेल्या रस्त्यांवर असलेल्या ढीगभर खड्ड्यांमधून पादचाºयांपासून जनावरांपर्यंत सगळीकडे लक्ष ठेवून गाडी चालवणे ही कर्तबगारी शौर्यपदकाच्या लायकीची नक्कीच आहे. या रस्त्यांवर खरेच हेल्मेटची गरज आहे का?पूर्ण गाडीचा चेंदामेंदा होऊनही वाचलेले व घरात पाय घसरून पडून मेलेले अशा दोन टोकांची परिस्थिती अनेकांना परिचित असलेच. प्रयत्न व नशीब ही वरवर विरुद्ध वाटणारी टोके ‘एकत्र’ परिणाम घडवून आणत असतात. म्हणूनच नागमोडी वळणे घेऊन चालवणारा हेल्मेटधारी व शिस्तीत चालवणारा सुद्धा नशीबापुढे हतबल ठरतो. (इथे नशीब म्हणजे ग्रहतारे नसून आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असणा-या व शेवटी परिणामांवर काम करणाºया / प्रभाव टाकणाºया गोष्टी समजाव्यात.)काय करायला हवे :अ) वाहतुकीचे नियम पाळणे : अत्यंत शिस्तीने वाहन चालवणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम ठेवणे या दोन गोष्टींवर प्रयत्नांची दिशा ठरवायला हवी. नियमांची जागरूकता वाढवायला हवी़ कारण ब-याच जणांना अगदी साधेसाधे नियम माहित नसतात.ब) रस्ते व खड्डे : रस्ते पूर्णपणे खड्डे विरहीत असावेत. एकाच वेळी खाली खड्ड्यांकडे बघून-वर बघून गाडी चालवणे हे दिव्यच आहे. रस्ते बनवणारे व वापरणारे या दोघांमुळे रस्ते लवकर खराब होतात. नगरमध्ये पाणी सुटले की रस्त्यांवर धुणं धुण्याची घर धुवून ते पाणी समोर सोडण्याची आदिम प्रथा आहे. या पाण्यामुळे रस्ते खराब होतात. पावसाळ्यात आपणच केलेल्या अतिक्रमणांमुळे, नालीत टाकलेल्या कच-यामुळे रस्ते तुंबतात. पावसाळ्यानंतर लगेच रस्ते म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरकडाचे नकाशे असल्यासाखे वाटायला लागतात. आपल्याच स्वकर्माची फळं दुसरे काय?आत्ताच नवीन बनवलेला रस्ता केबल टाकण्यासाठी खणण्याची परवानगी कशी दिली जाते? हा प्रश्न म्हणजे खरं तर ‘जग कसे निर्माण झाले असावे?’ या प्रश्नाच्या तोडीचा नक्कीच आहे. रस्त्याच्या कंत्राटापासून सुरू झालेली अर्थसाखळी चालवणा-यांना याच रस्त्याने आपण स्वत: परिवार आपले मित्र रोज प्रवास करणार आहोत, याची सतत आठवण करून द्यावी.यांमधील कुणीही प्रिय व्यक्ती दगावल्यास हा मी वैयक्तिक लोभापायी केलेला खून आहे, असे अंतर्मनाला त्यांनी नक्की सांगावे.क) कायदे व अंमलबजावणी :कायद्यापुढे सर्व समान असतात हे वाक्य विनोद वाटावी अशी स्थिती आपल्या देशात आहे. मायकेल फेप्ल्स या आॅलिंम्पीक इतिहासात सर्वात जास्त पदके मिळवणाºया सेलिब्रिटीला सुद्धा अमेरिकेत नियम मोडला म्हणून शिक्षा होऊ शकते अन् भारतात सलमान खान....! नगरमध्ये तर वाहतूक पोलिसाने अडवल्यास इथे तुला माहिती आहे, का मी कोण आहे? साहेबाला फोन लावू का? असे दमात घेणारे नरवीर फुटाफुटांवर सापडतात. सर्वात जास्त अपघात सिग्नलवर होतात. दंड किंवा शिक्षा होत नसेल तर नियम-कायदे हे फक्त कागदी घोडे बनून कायद्याच्या जाडजूड पुस्तकांमध्येच राहतील.ट्रॅफीक सिग्नल हे फक्त बुजगावण्याप्रमाणे वाटतात. सिग्नल तोडणारे बिनदिक्कत निघून जातात तर हेल्मेट नसलेला पावती फाडत असतो.ड) रस्ता सुद्धा पवित्रच आहे :रस्ता ही गोष्ट मंदिराइतकीच पवित्र आहे. त्यांच्यामुळेच आपण चटकन हॉस्पिटलला, कामावर पोहचू शकतो. २२ वर्षे एकट्याने डोंगर फोडून रस्ता बनवणा-या दशरथ मांझी यांच्या आयुष्यावर असणारा ‘‘मांझी - द माऊंटन मॅन’ हा हिंदी चित्रपट रस्त्यांवर घाण टाकणा-यांनी, अतिक्रमणे करणाºयांनी, मंडप, लग्न, जेवणावळी करणा-यांनी जरूर पाहावा, म्हणजे रस्त्यांची खरी किंमत कळेल.सक्ती व व्यक्ती स्वातंत्र्य :हेल्मेट न वापरता गाडी चालवणे, त्यात असणारा धोका याबाबत जनजागरण करावे, सक्तीचा सरकारने हा हट्ट त्यानंतर सोडून द्यावा. धोका माहीत असूनही एखादी गोष्ट करणे अथवा न करणे हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार नाही का? सुरक्षा व आरोग्य ही पूर्णत: ‘वैयक्तिक’ जबाबदारी आहे. सरकारने फक्त सुविधा पुरवाव्यात, नित्याने नवनवीन नियम व बंधने नकोत. कुणालाही मृत्यू किंवा अपंगत्व नकोय.ताओंच्या एका कवितेचा आशय आहे की, जेवढे जास्त नियम असतील तेवढी प्रजा मूढ अथवा राजा कठोर समजावा. नियम तोडण्याचे नवनवीन मार्ग फक्त लोक शोधतील. स्वेच्छेने जेव्हा एखादा समाज सर्वांच्या भल्यासाठी नियम बनवतो व पाळतो तेव्हा पोलीस व कोर्ट यांची गरज उरत नाही. उरते ते फक्त एक ‘आदर्श राज्य’.डॉ. अमोल खांदवे

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर