शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाणी असतानाही पिके का जाळताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातल घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनत आहे. तरीही घोड ...

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातल घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनत आहे. तरीही घोड धरणाचे आवर्तन लांबणीवर टाकण्यात आले आहे. धरणात पाणी शिल्लक असतानाही पिके का जाळताय? असा सवाल जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते व जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला आहे.

घोड धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. धरणात सध्या चार टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या परिस्थितीत तीन आवर्तने शेतीसाठी सुटू शकतात.

कालवा सल्लागार समितीची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना कुठे ही विचारात घेतल्या गेलेल्या दिसत नाहीत. ऊस, फळबागा इतर पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहे. ही पिके पाणी येईपर्यंत जळून जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे घोड धरणातून २० जानेवारीपासून पाणी सोडले, तरच लाभक्षेत्रातील पिके जिवंत राहतील. याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मढेवडगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयास शेतकरी टाळे ठोकतील, असा इशारा शिवाजीराव पाचपुते व अनिल पाचपुते यांनी दिला आहे.

हंगेवाडी परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. घोडचे आवर्तन आठ दिवसांच्या आत न सोडल्यास नगर-दौड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी दिला आहे.

----

तसा अहवाल पाठविणार

घोड कालव्यावरील पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी आवर्तन लवकर सोडावे, याबाबत निवेदन दिले, तर आवर्तन नियोजनात बदल करावा, असा अहवाल वरिष्ठांना पाठविणार आहे.

-स्वप्निल काळे,

कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प विभाग २