शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

‘अगस्ती’वर ३५० कोटींचे कर्ज का झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST

अकोले : तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार झालेली समन्वय समिती सर्व स्तरांवर कार्यरत आहे. अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने वार्षिक सभेच्या ...

अकोले : तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार झालेली समन्वय समिती सर्व स्तरांवर कार्यरत आहे. अगस्ती साखर कारखाना प्रशासनाने वार्षिक सभेच्या निमित्ताने सभासदांच्या प्रश्नांची लेखी स्वरुपात उत्तरे द्यावीत. कारखान्यावर ३५० कोटींचा कर्जबोजा का झाला? ३० वर्षांत आदिवासी भागात ऊसक्षेत्र का वाढले नाही? असा सवाल आ.र डाॅ. किरण लहामटे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

अगस्तीच्या कार्यक्षेत्रात आजही एक लाख मेट्रीक टन ऊस तोडणीचा बाकी आहे. १७ महिन्यांचा ऊस झाला असून तुरे वाढल्याने वजन घटणार आहे. वेळेत ऊस तोडला गेला नाहीतर वेळप्रसंगी शेतकऱ्यांना घेवून आंदोलन छेडू, असा इशारा आ.डाॅ.लहामटे यांनी यावेळी दिला. अगस्ती साखर कारखान्याचे सेवानिवृत्त मुख्य लेखापाल दिवंगत मारुती गोपाळा भांगरे यांच्या हस्तलिखिताची अगस्ती साखर कारखान्याच्या भ्रट कारभाराचा जाहीर पंचनामा' अशी पुुुुस्तिका समन्वय समितीने तयार केेेली आहे. हेच सभासदांचे प्रश्न समजून प्रशासनाने सभासदांना उत्तरे द्यावीत, असे लेखी निवेदन शुक्रवारी कार्यकारी संचालक यांना देण्यात आले आहे, असेही लहामटे यांनी सांगितले.

यावेळी साथी दशरथ सावंत, डाॅ.अजित नवले, बी. जे. देशमुख, दादापाटील वाकचौरे, विनय सावंत, सोन्याबापू वाकचौरे, दिलीप शेणकर, संपत कानवडे उपस्थित होते.

....

सन्मवय समितीचे आरोप

कार्यक्षेत्रात ऊस नसताना जास्त क्षमतेचा कारखाना उभारला. २७ वर्षांत ११ वेळा अपेक्षित ऊस गाळप झाले नाही. मालमत्ता वाढवून दाखवून शेतकरी सभासदांच्या बोकांडी कर्जाचा डोंगर उभा केला. २८ कोटी ३० लाख कर्ज काढून गाळप क्षमता वाढविण्यासाठी खर्च व क्षमतेपेक्षा मोठा इथेनॉल प्रकल्प हे आत्मघातकी निर्णय कारखाना प्रशासनाने घेतले, असे आरोप समन्वय समितीने केले आहेत.

...