शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 14:54 IST

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

संगमनेर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. शेतक-यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखविणा-या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा आता उघड झाला आहे, अशी टिका त्‍यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवारी (दि.६) ग्रामसंसद भवनाचे उद्घाटनप्रसंगी आमदार विखे बोलत होते. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही. जिल्ह्याचे तीनही मंत्री कुठे गायब होते समजले नाही. परंतू आपण शक्य तेवढी मदत करून मतदारसंघातील सामान्य माणसाला दिलासा देवून सामाजिक बांधिलकी जपली.

केंद्र सरकारच्या नविन कृषी धोरणात शेती क्षेत्रातील बदलांचा अंतर्भाव असून या विधेयकांना केला जाणारा विरोध राजकीय द्वेषापोटी आहे. पण दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे महाविकास आघाडीचे नेते राज्यात शेतक-यांची वीज तोडली जात असताना गप्‍प बसतात.

राज्‍यातील आणि दिल्‍लीतील शेतकरी काही वेगळे आहेत का? महाविकास आघाडी सरकारने राज्‍यातील शेतक-यांच्‍या कोणत्‍याही मागण्‍या पूर्ण केल्‍या नाहीत. शेतकरी आणि दूध उत्पादकांवर सरकारकडून अन्यायच सुरु आहे. त्यांचे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम जनतेने ओळखले आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPoliticsराजकारण