शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

लोकसभा पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार?

By admin | Updated: July 15, 2024 14:45 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासाठी राज्यस्तरावर विचारमंथन सुरु झालेले असताना हे लोण लवकरच जिल्हास्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. मोदी लाटेआड लपण्याऐवजी या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार, याविषयी कुजबुज सुरु झाली आहे. पाडापाडी झाली, याबाबतही त्यांच्यात दुमत नसल्याचे दिसून आले. मात्र यासाठी जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. या सर्व घडामोडीत नेत्यांप्रमाणेच संघटनात्मक स्तरावर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडले पाहिजे, अशी कुजबुज त्यांचे पक्षातील विरोधक करु लागले आहेत. नगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार एवढ्या विक्रमी मताने पराभव झालेला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा तालुक्यातून विरोधी भाजपाचे उमेदवार दिलीप गांधी यांना विक्रमी ५८ हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जिल्हाध्यक्ष शेलार उमेदवार राजळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यात निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार गांधी यांना सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंदा तालुक्यातून मिळालेले आहे. यामुळे राजळे यांची चांगलीच पीछेहाट झाली आहे. यामुळे दक्षिण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. याचे खापर स्थानिक आमदारांसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांवरही फोडले जात आहे. हीच अवस्था शिर्डी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या श्रीरामपूर मतदारसंघात झाली आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या वडाळी या गावात भाजपाचे उमेदवार गांधी यांना १६ मतांची आघाडी मिळाली असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच तालुक्यातूनही मोठे मताधिक्य मिळाले असून याची कारणमीमांसा योग्य वेळी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.