शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार?

By admin | Updated: July 15, 2024 14:45 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासाठी राज्यस्तरावर विचारमंथन सुरु झालेले असताना हे लोण लवकरच जिल्हास्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. मोदी लाटेआड लपण्याऐवजी या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार, याविषयी कुजबुज सुरु झाली आहे. पाडापाडी झाली, याबाबतही त्यांच्यात दुमत नसल्याचे दिसून आले. मात्र यासाठी जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. या सर्व घडामोडीत नेत्यांप्रमाणेच संघटनात्मक स्तरावर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडले पाहिजे, अशी कुजबुज त्यांचे पक्षातील विरोधक करु लागले आहेत. नगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार एवढ्या विक्रमी मताने पराभव झालेला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा तालुक्यातून विरोधी भाजपाचे उमेदवार दिलीप गांधी यांना विक्रमी ५८ हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जिल्हाध्यक्ष शेलार उमेदवार राजळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यात निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार गांधी यांना सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंदा तालुक्यातून मिळालेले आहे. यामुळे राजळे यांची चांगलीच पीछेहाट झाली आहे. यामुळे दक्षिण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. याचे खापर स्थानिक आमदारांसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांवरही फोडले जात आहे. हीच अवस्था शिर्डी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या श्रीरामपूर मतदारसंघात झाली आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या वडाळी या गावात भाजपाचे उमेदवार गांधी यांना १६ मतांची आघाडी मिळाली असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच तालुक्यातूनही मोठे मताधिक्य मिळाले असून याची कारणमीमांसा योग्य वेळी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.