शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

लोकसभा पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार?

By admin | Updated: July 15, 2024 14:45 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासाठी राज्यस्तरावर विचारमंथन सुरु झालेले असताना हे लोण लवकरच जिल्हास्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. मोदी लाटेआड लपण्याऐवजी या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार, याविषयी कुजबुज सुरु झाली आहे. पाडापाडी झाली, याबाबतही त्यांच्यात दुमत नसल्याचे दिसून आले. मात्र यासाठी जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. या सर्व घडामोडीत नेत्यांप्रमाणेच संघटनात्मक स्तरावर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडले पाहिजे, अशी कुजबुज त्यांचे पक्षातील विरोधक करु लागले आहेत. नगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार एवढ्या विक्रमी मताने पराभव झालेला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा तालुक्यातून विरोधी भाजपाचे उमेदवार दिलीप गांधी यांना विक्रमी ५८ हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जिल्हाध्यक्ष शेलार उमेदवार राजळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यात निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार गांधी यांना सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंदा तालुक्यातून मिळालेले आहे. यामुळे राजळे यांची चांगलीच पीछेहाट झाली आहे. यामुळे दक्षिण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. याचे खापर स्थानिक आमदारांसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांवरही फोडले जात आहे. हीच अवस्था शिर्डी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या श्रीरामपूर मतदारसंघात झाली आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या वडाळी या गावात भाजपाचे उमेदवार गांधी यांना १६ मतांची आघाडी मिळाली असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच तालुक्यातूनही मोठे मताधिक्य मिळाले असून याची कारणमीमांसा योग्य वेळी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.