शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणी टँकरची गरज कोणाची? सर्वसामान्यांची की राजकारण्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

अहमदनगर : शासनाच्या फेज-२ पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असतानाच दरवर्षी टँकरवर लाखो रुपये खर्च ...

अहमदनगर : शासनाच्या फेज-२ पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असतानाच दरवर्षी टँकरवर लाखो रुपये खर्च होत असून, टँकरची गरज सर्वसामान्यांची आहे की राजकारण्यांची असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाकडून फेज-२ आणि त्यानंतर अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सुमारे ११६ कोटी रुपये खर्चून फेज-२ पाणी योजनेचे काम सुरू आहेत. तसेच सुमारे १२४ कोटींची अमृत पाणी योजना राबविण्यात येत आहेत. या दोन्ही योजनांची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. फेज-२ पाणी योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. असे असताना सन २०१० ते २०२१ या काळात टँकरच्या खर्चात एका रुपयाची कपात झालेली नाही. उलटपक्षी टँकरवरील खर्चात वाढ होत असून, गेल्या ११ वर्षांत टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या दीपाली ट्रान्सपाेर्टला अदा केले गेले आहेत, अशी माहिती माहिती अधिकारात महापालिकेकडून देण्यात आली आहे.

....

सारसनगर कल्याण रोड भागाला टँकरने पाणीपुरवठा

सन २०१० मध्ये शहरातील काही भागात पाणीपुरवठा हाेत नव्हता. वाढत्या लोकवस्तीमुळे नळाद्वारे पाणी देणे शक्य नव्हते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, पाणी योजना आल्याने अनेक भागातील टँकर बंद होऊन सध्या सारसनगर व कल्याण रोड भागातच फक्त टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच ज्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशा भागात नागरिकांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हे प्रमाण अत्यल्प आहे.

...

दहा वर्षांपासून दीपाली ट्रान्सपाेर्टलाच ठेका

ग्रामीण भागात टँकरने पाणीपुवठा करण्यासाठी दरवर्षी निविदा मागविण्यात येतात. महापालिकेत मात्र गेल्या दहा वर्षांपासून एकमेव दीपाली ट्रान्सपोर्ट या संस्थेलाच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला असून, या संस्थेला कोट्यवधींची बिले अदा करण्यात आलेली आहेत. ही संस्था शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून, महापालिकेत सत्ता कुणाचीही असो, टँकरचा ठेका मात्र दीपाली ट्रान्सपोर्टकडे असतो, हे विशेष.

..

असा झाला खर्च

सन २०१८- ८० लाख

सन २०१९-९० लाख १२ हजार

सन २०२०- ८५ लाख १० हजार