शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टँकर गेले कुण्या गावा ? आदिवासी वस्तीत दोन महिन्यातून एकदाच टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:47 IST

अकोले तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव मन्याळे येथील चार वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार आहे़ येथे टँकर वेळेत येतो़

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : अकोले तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव मन्याळे येथील चार वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार आहे़ येथे टँकर वेळेत येतो़ मात्र येथून जवळच असलेल्या केळीओतूर ग्रामपंचायत क्षेत्रात टँकरच्या खेपांबाबत लॉग बुकवर ग्रामसेवकाची गेल्या काही दिवसांपासून स्वाक्षरीच झालेली नाही़ त्यामुळे हा टँकर गावात जातो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़अकोले तालुक्यातील दक्षिण भागातील पहिले टंचाईग्रस्त गाव मन्याळेत यंदाच्या भयंकर दुष्काळात मार्च महिन्यापासून टँकर सुरू आहे. या गावात दररोज तर पिसेवाडी धराडेवाडीसाठी दिवसाआड पाणीपुरवठा होतो़ विहिरीत पाणी टाकून पाणी पुरवठा होतो . सार्वजनिक बांधकाम विभागाचा टँकर पाणीपुरवठा करत असल्याने त्यावर जीपीएस यंत्रणा नाही. मात्र लॉग बुक व्यवस्थित भरलेले आढळले तर ग्रामसेवक किशोर मांढरे यांच्या उपस्थित ग्रामस्थांना पाणीवाटप झालेले दिसले़ मात्र याच गावातील विलासनगर या आदिवासी ठाकर वस्तीवर दोन महिन्यात फक्त चार वेळा टँकर आल्याचे तुकाराम डोके या युवकाने सांगितले. बोरी पाझर तलावातून केळीओतूर, गारवाडी, डोंगरवाडी, हांडे वस्तीवर दररोज दोन खेपा होतात़ मात्र लॉगबुकवर अनेक दिवसांपासून ग्रामसेवकाची सहीच झालेली नसल्याचे समोर आले आहे. केळीओतूर येथे टँकर वेळेत पोहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केळीओतूर, गारवाडी, डोंगरवाडी , हांडेवस्तीच्या टँकर खेपांची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले