शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाटा आनंदाच्या धुंडाळताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 17:02 IST

नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जातात आणि मग त्यांच आयुष्य सगळ्या चिंता आणि काळजीने काळवंडतं. म्हणून आयुष्याला नवी झळाळी देताना जे विचार विविध नात्यांच्या भोव-यात वागण्याचे भान देतात. त्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद महोत्सव साजरा करू शकतो.

चिंतन-पंडित वाघोरे / माणसाचं आयुष्य वेगवेगळ्या घटनांनी प्रभावित होतं. मनुष्य दु:ख जास्त लक्षात ठेवतो, पण आनंदाचं चांदणं टिपायला विसरतो. माणसाच्या आयुष्याचा प्रवास निरंतर चालत असतो. मग प्रत्येक दिवसागणिक कमी होणारं आयुष्य जगावं तरी कसं ? असा केविलवाणा सवाल काही लोक करतात. नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जातात आणि मग त्यांच आयुष्य सगळ्या चिंता आणि काळजीने काळवंडतं. म्हणून आयुष्याला नवी झळाळी देताना जे विचार विविध नात्यांच्या भोव-यात वागण्याचे भान देतात. त्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद महोत्सव साजरा करू शकतो.आनंदी विचारांची सुरुवात म्हणजे आयुष्याची नवी पहाट. ज्यात तुमच्यात असलेल्या भक्कम बाजूवर लक्ष केंद्रित करायचं, दुबळी बाजू शोधून काढायची.  समोर असलेल्या संधीचं मूल्यमापन करायचं. असलेल्या धोक्याबाबत काळजी घ्यायची. मग सुरु होईल आयुष्याचा रंजक प्रवास. स्वत: ज्ञानी होणं ही स्वयंसुधारणेची सुरुवात असते. माणसं अनेक कामाचं टेन्शन घेतात. दबाव, तणाव अग्निसारखे असते. त्यापलिकडेही जाऊन तो धगधगता निखारा आहे. या निखा-यावर नियंत्रण ठेवायचं असतं. त्याची ऊब घ्यायची असते. त्याला हवा देऊन त्याचे ज्वालात रुपांतर होणार नाही, याचं भान मनुष्याने ठेवायचे असते. स्वत:ला ओळखणे ही तर यशाची गुरुकिल्ली असते. कधीकधी तर मौन सर्वोत्तम असतं. मासेमारी करणारा माशासाठी गळ पाण्यात टाकतो. परंतु तोंड बंद ठेवले तर मासाही अडचणीत येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन मनाचा आरसा असतो. तो नेहमी विचार परावर्तीत करीत असतो. कसं बोलावं हे जर कळत नसेल तर केंव्हा गप्प बसावं हे तर मनुष्याने शिकून घ्यायला हव.‘मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण’ हे संतवचन आहे. समुद्रात मोठे जहाज प्रवास करत असते. पण जोपर्यंत समुद्राचे पाणी जहाजात शिरत नाही तोपर्यंत अथांग समुद्र डौलात प्रवास करते. तसेच नकारात्मक विचारांचा शिरकाव आपल्या मनामध्ये होऊन देऊ नका. तरच आपण येणाºया संकटांचा सामना करू शकतो. आनंदी आयुष्य जगू शकतो. माणसानं स्वत:मधील दुर्बलतेचा शोध घेतला पाहिजे. कवयित्री बहिणाबाई चौधरींनी मनाचं वर्णन आपल्या कवितेत सुरेख केले आहे. ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं’. माणसाचं मन असच संवेदनशील असतं. म्हणून दिवसभराच्या कटकटी, अकारण चिंता नको, फालतू विषयांना टाकून देण्याच तंत्र म्हणे मन रिकामे करायला शिकले पाहिजे. मग आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी स्थिती येईल.परिस्थितीचं भान ठेवून माणसाने वागायला पाहिजे. अगदीच म्हणायचं झालं तर बदक जमिनीवर चालताना निवांत, शांत, निश्चिंत होऊन प्रवास करते. पण पाण्यात मात्र सतत पाय मारते. कठीण आणि नावडती कामे पुढे  ढकलू नका. त्याचे वेळेत नियोजन करून पूर्ण करा. म्हणजे तणावाला सुट्टी मिळेल. पैशाचे  नियोजन करता तसे वेळेचे नियोजन करा. दिवसाचा प्राधान्यक्रम ठरवा. आणखी एक माणसाचं लक्षात  ठेवलं पाहिजे. जगायचं पण मनाची कवाडे उघडी ठेवून. म्हणजे नव्या विकासाच्या कल्पनांना वाव मिळेल. पैशाच्या पाकिटापेक्षा मनाचा कप्पा मोठा हवा तरच खरी श्रीमंती येईन. दुसºयावर जळण्याने आपण जळू लागतो. निरुपयोगी गोष्ट विसरून जायला हवं.  सगळं लक्षात ठेवलं तर डोक्याची कचरा पेटी होईल. कुणाचेच पूर्ण अनुकरण करण्यापेक्षा सगळ्यांकडून थोडेथोडे शिकावे. माणसाकडे सिंहासारखे काळीज पाहिजे आणि कोल्ह्यासारखी चतुराई सुद्धा. मग बघा मनुष्याचे जीवन सर्वांगी सुंदर होईल ! 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक