शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी माती, वाळू आणली कोठून?; योजना संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:50 IST

राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राज्यात राबवली. मात्र, या झाडांसाठी माती व वाळू आणली कोठून? असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी झालेल्या वाळू व मातीच्या  खर्चाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

सुधीर लंके । अहमदनगर : राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राज्यात राबवली. मात्र, या झाडांसाठी माती व वाळू आणली कोठून? असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी झालेल्या वाळू व मातीच्या खर्चाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. झाडांची रोपे तयार करण्यासाठी माती लागते. दोन हजार रोपे तयार करण्यासाठी साधारणत: प्रत्येकी एक घनमीटर माती व बारीक वाळूचा वापर केला जातो. राज्य शासनाने सन २०१९ मध्ये राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. एवढी रोपे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती व वाळूचा वापर करावा लागेल. नगर जिल्ह्यात रोपे तयार करण्यासाठी किती वाळू व माती वापरण्यात आली? त्यापोटी महसूल विभागाकडे किती रॉयल्टी भरण्यात आली अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी महसूल प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, महसूल प्रशासनाने ही माहिती दिलेली नाही. सदरची माहिती वनविभागाकडे मिळेल, असे महसूलचे म्हणणे आहे. वनविभागानेही ही माहिती अद्याप दिलेली नाही. माती व वाळूच्या रॉयल्टीची माहिती महसूल विभागाकडे असायला हवी. मात्र, ही माहिती नाही याचा अर्थ रॉयल्टीच भरली गेलेली नाही. रोपांसाठी माती व वाळूवर बोगस पैसे दाखवून निव्वळ बिले काढली गेल्याची शक्यता चंगेडे यांनी व्यक्त केली आहे. रोपांसाठी अवैधपणे माती व वाळू वापरण्यात आली का याची चौकशी करावी, असा आदेश जिल्हा खनिकर्म विभागाने वनविभागाला दिला आहे. ..असा आहे रोपांचा हिशेबएक रोप तयार करण्यासाठी सुमारे साडेबारा रुपये खर्च येतो. नगर जिल्ह्यात २०१९ मध्ये १ कोटी १८ लाख रोपे लावण्यात आली. हा खर्च कोट्यवधीच्या घरात आहे. एवढ्या रोपांसाठी माती व वाळू कोठून आणली? त्याची रॉयल्टी भरली का? असा प्रश्न आहे. इतरही जिल्ह्यांत ही रॉयल्टी भरली गेली का? असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. 

वनविभागाने केलेल्या वृक्ष लागवडीसाठी किती वाळू व माती वापरण्यात आली? त्यापोटी रॉयल्टी भरण्यात आली का? याबाबतची चौकशी प्रशासनाने सुरु केली आहे, असे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी सांगितले.     

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरenvironmentपर्यावरणforest departmentवनविभाग