शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

राजस्थानमध्ये जाणाºया मजुरांना नगराध्यक्षच जेंव्हा पकडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 11:22 IST

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : इचलकरंजी येथील कापड मीलमध्ये काम करणारे कुटुंबिय आपल्या लेकरांसह माल वाहतूक गाडीतून  जात असताना देवळाली प्रवरा गुहा शिव परिसरात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले. कदम यांनी पोलिसांना  बोलावून घेत त्यांना प्रशासनाच्या हवाली केले. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करून माणुसकीही दाखवली. 

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : इचलकरंजी येथील कापड मीलमध्ये काम करणारे कुटुंबिय आपल्या लेकरांसह माल वाहतूक गाडीतून  जात असताना देवळाली प्रवरा गुहा शिव परिसरात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले. कदम यांनी पोलिसांना  बोलावून घेत त्यांना प्रशासनाच्या हवाली केले. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करून माणुसकीही दाखवली. कोरोना पार्श्‍वभुमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात  आल्या. परंतु इचलकरंजी येथून सुमारे 70 जणांनी राजस्थान येथे जाणार्‍या मालवाहतूक वाहनांमध्ये बसून गावाकडे जाण्यास आगेकूच केली होती. दरम्यान, देवळाली प्रवरेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनात अनेक स्वयंसेवक प्रशासनाच्या कामकाजात हातभार लावत आहेत. त्यांनी देवळाली प्रवरा शहरात विविध भागात चेक पोस्ट सुरू केली आहे. गणेगाव रोड चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी सुरू असताना स्वयंसेवकांना खाद्य घेवून जात असलेल्या माल वाहतूक गाडीमध्ये काही लहान मुले दिसली. स्वयंसेवकांनी पाहणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये 60 ते 70 जण खाद्यामध्ये लपून बसलेले होते. त्यांच्यावर ताडपत्रीचे आवरण टाकलेले होते.स्वयंसेवकांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याशी संपर्क साधला. नगराध्यक्ष कदम यांनी सर्वांना एका शाळेत नेत तहसीलदार व पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. पकडलेल्या परप्रांतीय नागरीकांना जेवणाची व्यवस्था नगराध्यक्ष कदम यांनी केली. राहुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन बागूल, पोलिस हावलदार शिरसाठ, होमगार्ड प्रमुख अनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर गाडीमध्ये सापडलेल्या सर्व परप्रांतीय नागरीकांना राहुरी फॅक्टरी येथील शासकीय शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे.  इचलकरंजी येथील कापड मील कारखान्यातून संबंधित कामगारांनी राहुरी पर्यंत प्रवास केल्याचे पाहून प्रशासनही चक्रावले होते.------मजूर राहुरीतच राहणारराज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. माल वाहतूक करणार्‍यांनी परप्रांतीय नागरीकांना घेवून प्रवास करीत मोठी चूक केली. दरम्यान, संबंधित परप्रांतीय कामगारांना राहुरी फॅक्टरी येथील शाळेमध्ये ठेवावे लागणार आहे. लॉकडाऊन काळापर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून केली जाईल अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.