शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

गावोगावचे आठवडे बाजार कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार समित्यांसह इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले. आता आठवडे बाजार कधी सुरू ...

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार समित्यांसह इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले. आता आठवडे बाजार कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील बहुतांश भागातील आठवडे बाजार बंद झाले. एप्रिल, मे, जून असे जवळपास तीन महिने आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकविलेली तरकारी म्हणजेच भाजीपाल्याची काेठे विक्री करायची, याचा प्रश्न होता. अनेक शेतकऱ्यांनी गावोगावी वाडीवस्त्यांवर, शहरात गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री केली. अनेकांना वाहतूक परवडत नसल्याने त्यांनी बांधावरच भाजीपाला फेकून दिला. काहींनी थेट पिकावरच नांगर फिरविला. काहींनी उभ्या पिकात जनावरे घातली. त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

कोरोनाची लाट ओसरल्याने इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यात बाजार समित्याही सुरू झाल्या. आता आठवडे बाजारही सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

---

रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्री..

आठवडे बाजार बंद असल्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शेतकरी शहरासह गावागावात मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा बसून भाजीपाला विक्री करीत आहेत. मात्र, येथे आठवडे बाजारसारखी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांचीही कसरत होते. अनेक ठिकाणी अपुऱ्या जागेमुळे गर्दीही होते. त्यामुळे पुन्हा कोरोना फैलावण्याचीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.

---

शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प..

शेतीवर अवलंबून असलेले अनेक शेतकरी इतर पिकांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भाजीपाला पिके घेतात. ही पिके कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देतात. भाजीपाल्याची काही पिके तर अगदी एक ते दीड महिन्यात पैसे मिळवून देतात. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अशा भाजीपाला पिकांवर अवलंबून असतो. आठवडे बाजार बंद असल्याने अशा शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

-----

आम्ही वांगी, कारली, दोडके, टोमॅटो अशी तरकारी पिके घेतो. मात्र, दोन वर्षांपासून हमखास उत्पन्न मिळवून देणारी ही पिके तोट्याची ठरू लागली आहेत. यावर केलेला खर्चही निघत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक फवारणीसह वाहतूक खर्चही करावा लागतो. हा खर्च टाळण्यासाठी आठवडे बाजारात तरकारी विक्रीला आम्ही प्राधान्य देतो. मात्र, आठवडे बाजार बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-मच्छिंद्र शिंदे,

शेतकरी, श्रीगोंदा