शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

‘बाजीराव मस्तानी’ व श्रीगोंद्याच्या राजकारणाचा संदर्भ काय? : आमदार राहुल जगताप यांच्या वक्तव्याने वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 14:21 IST

‘भाजपने श्रीगोंदा शहरातील उमेदवाऱ्या कोणत्या निकषावर दिल्या.

अहमदनगर : ‘भाजपने श्रीगोंदा शहरातील उमेदवाऱ्या कोणत्या निकषावर दिल्या. श्रीगोंदा शहरात बाजीराव मस्तानी चित्रपट चालला आहे का?’ या राष्टÑवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. या विधानाला श्रीगोंदा नगरपालिकेतील महिला उमेदवारांनी आक्षेप घेतला असून हा महिलांचा अवमान असल्याची तक्रार राष्टÑवादीकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही जगताप यांची ‘री’ ओढली आहे.श्रीगोंद्याचे नगराध्यक्षपद महिला वर्गाला राखीव आहे. पालिकेत पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. असे असताना जगताप यांनी ‘बाजीराव मस्तानी’चा संदर्भ निवडणुकीत कशासाठी आणला? याबाबत श्रीगोंदा शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.जगताप यांनी या विधानाचा इन्कार केलेला नसून उलट मी कोणाचेही नाव घेऊन बोललेलो नाही. जर कोणाला जिव्हारी लागले असेल तर माझा नाईलाज आहे, असे समर्थन केले आहे. मात्र, जगताप यांना या विधानातून नेमके काय ध्वनित करावयाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या आरोपांना जातीय संदर्भही प्राप्त झाल्याने विविध समाज घटकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट व श्रीगोंद्याचे राजकारण याचा काय संदर्भ ? हा प्रश्न राष्टÑवादीचे नेते आमदार जगताप यांना विचारणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.‘बाजीराव मस्तानी’ म्हणजे काय? जगतापच सांगतीलआमदार जगताप यांनी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. ‘बाजीराव मस्तानी’चा संदर्भ त्यांनी दिला असला तरी ज्यांना तो लागला तीच मंडळी याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी जगताप यांच्याकडे खुलासा मागितला तर ते त्याचे उत्तर देतील किंवा विरोधकांनी ‘बाजीराव मस्तानी’ कोण आहे हे विचारले तर त्याचेही ते उत्तर देतील, असे सांगत फाळके यांनीही जगताप यांच्या विधानाचे एकप्रकारे समर्थन केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा