शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

‘बाजीराव मस्तानी’ व श्रीगोंद्याच्या राजकारणाचा संदर्भ काय? : आमदार राहुल जगताप यांच्या वक्तव्याने वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 14:21 IST

‘भाजपने श्रीगोंदा शहरातील उमेदवाऱ्या कोणत्या निकषावर दिल्या.

अहमदनगर : ‘भाजपने श्रीगोंदा शहरातील उमेदवाऱ्या कोणत्या निकषावर दिल्या. श्रीगोंदा शहरात बाजीराव मस्तानी चित्रपट चालला आहे का?’ या राष्टÑवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. या विधानाला श्रीगोंदा नगरपालिकेतील महिला उमेदवारांनी आक्षेप घेतला असून हा महिलांचा अवमान असल्याची तक्रार राष्टÑवादीकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही जगताप यांची ‘री’ ओढली आहे.श्रीगोंद्याचे नगराध्यक्षपद महिला वर्गाला राखीव आहे. पालिकेत पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. असे असताना जगताप यांनी ‘बाजीराव मस्तानी’चा संदर्भ निवडणुकीत कशासाठी आणला? याबाबत श्रीगोंदा शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.जगताप यांनी या विधानाचा इन्कार केलेला नसून उलट मी कोणाचेही नाव घेऊन बोललेलो नाही. जर कोणाला जिव्हारी लागले असेल तर माझा नाईलाज आहे, असे समर्थन केले आहे. मात्र, जगताप यांना या विधानातून नेमके काय ध्वनित करावयाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या आरोपांना जातीय संदर्भही प्राप्त झाल्याने विविध समाज घटकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट व श्रीगोंद्याचे राजकारण याचा काय संदर्भ ? हा प्रश्न राष्टÑवादीचे नेते आमदार जगताप यांना विचारणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.‘बाजीराव मस्तानी’ म्हणजे काय? जगतापच सांगतीलआमदार जगताप यांनी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. ‘बाजीराव मस्तानी’चा संदर्भ त्यांनी दिला असला तरी ज्यांना तो लागला तीच मंडळी याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी जगताप यांच्याकडे खुलासा मागितला तर ते त्याचे उत्तर देतील किंवा विरोधकांनी ‘बाजीराव मस्तानी’ कोण आहे हे विचारले तर त्याचेही ते उत्तर देतील, असे सांगत फाळके यांनीही जगताप यांच्या विधानाचे एकप्रकारे समर्थन केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा