शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

हवामान खाते व आपत्ती व्यवस्थापनामुळे वादळात राज्याची हानी टळली; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:50 IST

हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

 अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठकीसाठी आले असता मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निसर्ग चक्रीवादळाचा आधीच अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट  होत्या. एनडीआरएफ टिम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्कता दाखवल्याने जीवितहानी टळली. वादळ आल्यानंतरही जी  काही थोडी पडझड झाली किंवा महामार्गावर झाडे पडली ते यंत्रणेने रात्रीतून दूर केले. इतर जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे काम महसूल यंत्रणेकडे सुरू आहे.

 दरम्यान, कोरोनामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सरकारचा महसूल बंद होता. परंतु सर्व शासकीय कार्यालये आणि महसूल देणा-या यंत्रणा सुरू झाल्याने आता स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मंत्रिमंडळाची समिती गठीत करण्यात आली  आहे. ही समितीही आढावा घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन उत्तम कार्य करीत आहे. लोकांनीही आता स्वयंशिस्त पाळून कोरोनाबरोबर जगण्याचे शिकण्याची गरज आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात