शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हवामान खाते व आपत्ती व्यवस्थापनामुळे वादळात राज्याची हानी टळली; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:50 IST

हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

 अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठकीसाठी आले असता मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निसर्ग चक्रीवादळाचा आधीच अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट  होत्या. एनडीआरएफ टिम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्कता दाखवल्याने जीवितहानी टळली. वादळ आल्यानंतरही जी  काही थोडी पडझड झाली किंवा महामार्गावर झाडे पडली ते यंत्रणेने रात्रीतून दूर केले. इतर जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे काम महसूल यंत्रणेकडे सुरू आहे.

 दरम्यान, कोरोनामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सरकारचा महसूल बंद होता. परंतु सर्व शासकीय कार्यालये आणि महसूल देणा-या यंत्रणा सुरू झाल्याने आता स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मंत्रिमंडळाची समिती गठीत करण्यात आली  आहे. ही समितीही आढावा घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन उत्तम कार्य करीत आहे. लोकांनीही आता स्वयंशिस्त पाळून कोरोनाबरोबर जगण्याचे शिकण्याची गरज आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात