शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वेळ आलीच तर.. नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईवर धडक मारू -विवेक कोल्हे

By सचिन धर्मापुरीकर | Updated: November 3, 2023 18:31 IST

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध : कोपरगावात लाक्षणिक उपोषण

कोपरगाव (जि. अहमदनगर) : सरकारमध्ये असतानाच आमचे बहुतांश आंदोलन झाली आहे. हक्काच्या व्यक्तीकडेच हट्ट धरला जातो. सरकार जरी आमच्या विचाराचे असले तरी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी नाही. त्यामुळे राजकिय, प्रशासकिय यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनी दाखवलेले नैराश्य चिंताजनक आहे. त्यामुळे 'ज्याचे शेतकऱ्यांवर लक्ष तोच आपला पक्ष, हेच आपले धोरण'. सणासूदीच्या दिवसांत आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तिव्र करावे लागेल. नगर, नाशिक येथील शेतकऱ्यांना संघटीत करून वेळ पडल्यास मुंबईवर धडक मारण्याची आमची तयारी असल्याचा इशारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिला.

जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातुन पाणी सोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून शुक्रवारी कोपरगाव येथील तहसिल कार्यालयासमोर विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी निवेदन स्विकारले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या, 'कसे लढायचे, आणि कसे भिडायचे' हे आम्हाला स्व. शंकरराव कोल्हे यांनी शिकवले आहे. पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे राजकिय पक्ष, संघटनांनी एकत्र येवून लढा उभारण्याची गरज आहे. गोदावरी खोरे तुटीचे असतानाही येथून पाणी सोडणे म्हणजे, 'एकाला तारण्यासाठी, दुसऱ्याला मारण्या सारखे आहे'. आमचे हक्काचे पाणी घेण्याऐवजी जायकवाडीच्या २६ टीएमसी मृतसाठ्यातील ५ टीएमसी पाणी वापरण्याची परवाणगी दिली, तर नगर, नाशिकचे पाणी सोडण्याची गरज पडणार नाही.

यावेळी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, बाळासाहेब वक्ते, दिलीप बनकर, दत्ता काले, दिपक चौधरी, संजय सातभाई, शरदराव थोरात, साहेबराव रोहोम, केशवराव भवर, राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुणकर, प्रदिप नवले, विजय रोहोम, शिवाजीराव वक्ते, रविंद्र पाठक, सुनील देवकर, श्री आढाव, संदीप देवकर, अनिल गायकवाड, विनय भगत, विवेक सोनवणे, विनोद चोपडा, कैलास जाधव, बबलू वाणी, वैशाली साळूंके, वैशाला आढाव यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागण्यामेंढेगिरी समिती कालबाह्य झालेली आहे, त्यासाठी जो अभ्यासगट नेमण्यात आलेला आहे, त्याचा अहवाल आल्याशिवाय उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यांत येवु नये. गोदावरी कालवे लाभक्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती, पिण्याचे पाणी, पशुधन यासाठी जी आर्वतने द्यावी लागणार आहे, त्यात पाण्यांचे प्रचंड लॉसेस होणार असल्याने पाण्याची तुट निर्माण होणार आहे. त्यामुळे मुळातच तुट असलेल्या क्षेत्रातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येवु नये.

नगर नाशिक, विरुध्द मराठवाडा असा प्रादेशिक पाण्यांचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यांसाठी अप्पर वैतरणातुन समुद्रास वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी सेंडल गेट द्वारे त्वरीत मुकणे धरणांत वळवून अप्पर वैतरणा धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढवावी. सहयाद्री पर्वत माथ्यावरील पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे ३० वळण बंधाऱ्याद्वारे तातडीने गोदावरी खोऱ्ंयात वळविण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. पश्चिम वाहिन्या, नार पार, दमणगंगा, पिंजाळ, वैतरणा, उल्हास खोऱ्यातील समुद्राला वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी युध्द पातळीवर नियोजन करावे.

गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापनालाक्षणिक उपोषणात हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या ध्वजाचे अनावरण माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी 'मराठवाडा तुपाशी, नगर-नाशिक उपाशी', ' कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही', मेंढेगिरी समितीचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दाणाणून गेला होता.