शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

आम्ही करील त्याच्याविरुद्ध करायचे, ही महादेव जानकर यांची भूमिका - अण्णा डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:26 IST

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. 

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर अण्णा डांगे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रावर इतिहासाने कायम अन्याय केला आहे. १९९४-९५ सालापर्यंत अहिल्यादेवींची जयंती साजरी होत नव्हती. कोणाला माहितीही नव्हती. अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी व्हायची. आमचे एक धनगर समाजेच संघटन आहे. धनगर समाज महासंघ आणि यशवंत सेना असे दोन संघटन धनगर समाजात आहेत. बापू केंकरे गेल्यानंतर महादेव जानकर हे एका गटाचे प्रमुख झाले. त्यांची आमची दोस्ती आहे. मात्र आमच्याविरुद्ध करायचे, अशी त्यांची भूमिका असते. त्यानंतर ३१ मे रोजी जयंती साजरी करण्याचा निर्णय जानकर यांनी घेतला. त्यानुसार जयंती उत्सव सुरू झाला. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. राम शिंदे व महादेव जानकर दोघेही मंत्री झाले. आता कोणाच्या नेतृत्त्वाखाली जयंती उत्सव साजरा करायचा, हा प्रश्न होता. महादेव जानकर यांनी मुंबई येथुन जयंती साजरी करण्याची घोषणा केली. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव आहे. येथेच जयंती साजरी करायची, असा निर्णय राम शिंदे यांनी घेतला.लॉकडाऊन असल्याने यंदा जयंती साजरी करायची नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी बंद झाली. यंदा हेलिकॉप्टरने पादुका जाणार आहेत. असे असकताना आम्ही कशी जयंती साजरी करणार. आम्ही साजरी केली असती तर तंटा-बखोडा निर्माण झाला असता.त्यामुळे सार्वजनिक स्वरुपात जयंती साजरी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे डांगे म्हणाले.