शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही करील त्याच्याविरुद्ध करायचे, ही महादेव जानकर यांची भूमिका - अण्णा डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:26 IST

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. 

चौंडी (जि. अहमदनगर) :  माजी मंत्री महादेव जानकर यांची आणि आमची कितीही दोस्ती असली तरी आम्ही जे करू त्याच्याविरुद्ध करायचे अशीच त्यांची भूमिका असते. अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांनी ३१ मे रोजी चौंडीत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जानकर यांनी मुंबईत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थळ आहे. म्हणून राम शिंदे यांनी जयंती उत्सव चौंडीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आज सकाळी चौंडीत सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केल्यानंतर अण्णा डांगे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रावर इतिहासाने कायम अन्याय केला आहे. १९९४-९५ सालापर्यंत अहिल्यादेवींची जयंती साजरी होत नव्हती. कोणाला माहितीही नव्हती. अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी व्हायची. आमचे एक धनगर समाजेच संघटन आहे. धनगर समाज महासंघ आणि यशवंत सेना असे दोन संघटन धनगर समाजात आहेत. बापू केंकरे गेल्यानंतर महादेव जानकर हे एका गटाचे प्रमुख झाले. त्यांची आमची दोस्ती आहे. मात्र आमच्याविरुद्ध करायचे, अशी त्यांची भूमिका असते. त्यानंतर ३१ मे रोजी जयंती साजरी करण्याचा निर्णय जानकर यांनी घेतला. त्यानुसार जयंती उत्सव सुरू झाला. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. राम शिंदे व महादेव जानकर दोघेही मंत्री झाले. आता कोणाच्या नेतृत्त्वाखाली जयंती उत्सव साजरा करायचा, हा प्रश्न होता. महादेव जानकर यांनी मुंबई येथुन जयंती साजरी करण्याची घोषणा केली. चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव आहे. येथेच जयंती साजरी करायची, असा निर्णय राम शिंदे यांनी घेतला.लॉकडाऊन असल्याने यंदा जयंती साजरी करायची नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी बंद झाली. यंदा हेलिकॉप्टरने पादुका जाणार आहेत. असे असकताना आम्ही कशी जयंती साजरी करणार. आम्ही साजरी केली असती तर तंटा-बखोडा निर्माण झाला असता.त्यामुळे सार्वजनिक स्वरुपात जयंती साजरी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे डांगे म्हणाले.