शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोपर्डीप्रकरणी लढा चालूच ठेवू

By admin | Updated: July 19, 2016 00:05 IST

कर्जत : कोपर्डीची घटना दिल्लीपेक्षा भयानक आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत लढा चालूच ठेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोपर्डी ग्रामस्थांना दिली.

कर्जत : कोपर्डीची घटना दिल्लीपेक्षा भयानक आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत लढा चालूच ठेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोपर्डी ग्रामस्थांना दिली.सोमवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे विखे यांनी सांत्वन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. हा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तपास दिरंगाईने सुरू होता. जनतेच्या रेट्यामुळे त्याचा वेग वाढला. दिल्लीपेक्षा ही घटना भयानक असताना ग्रामस्थांनी मोठा संयम दाखविला. या प्रकरणात आम्ही शेवटपर्यंत मदत करणार आहे.यावेळी विखे यांच्यासोबत भाऊसाहेब कांबळे, अण्णासाहेब शेलार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी आदी हजर होते. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी पीडित कुटुंबास १ लाख रुपयांची तर बीडच्या प्रायव्हेट क्लास संघटनेतर्फे प्रा. श्रीराम चौभारे यांनी १ लाख ११ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)मुंडे, मेटे कोपर्डीत४विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार रश्मी बागल, शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे, डॉ. सुजय विखे, काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, मिनाक्षी साळुंके आदी मान्यवरांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.