शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

शूरा आम्ही वंदिले! : सहज झेलल्या गोळ्या निधड्या छातीवरती, सुखदेव रोकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 11:12 IST

सुखदेव रोकडे म्हणजे शिस्तीचा माणूस. त्यांचे असेच वर्णन कुटुंबीयांकडून आजही केले जाते. सैन्यात गेल्यानंतर ही शिस्त त्यांच्या अंगात भिनली.

ठळक मुद्देहवालदार सुखदेव रोकडे युध्दसहभाग आॅपरेशन रक्षकसैन्यभरती १९८५वीरगती २३ एप्रिल १९९६सैन्यसेवा सुमारे ११ वर्षे वीरपत्नी हिराबाई सुखदेव रोकडे

सुखदेव रोकडे म्हणजे शिस्तीचा माणूस. त्यांचे असेच वर्णन कुटुंबीयांकडून आजही केले जाते. सैन्यात गेल्यानंतर ही शिस्त त्यांच्या अंगात भिनली. देशाचा अभिमान त्यांच्या नसानसातून ओसंडून वहात होता. काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर एखादा हबकून गेला असता. सुखदेव यांना मात्र या नियुक्तीने आनंद झाला. देशासाठी काही करून दाखवण्याची ही त्यांनी संधी मानली.म्मू काश्मीर हा भारताचा कायमचा अशांत भाग. वाळवणे (ता. पारनेर) येथील सुखदेव रोकडे या तरूण जवानाला लष्करातील १० वर्षांच्या सेवेनंतर सन १९९६ मध्ये तिथे नेमणूक मिळाली तेव्हा तो भलताच सुखावला. काही करण्याची, करून दाखवण्याची संधी मिळणार याची त्याला खात्रीच पटली. वाळवणे तसा दुष्काळीच भाग. वडील मारूती रोकडे शेती करून कुटुंब चालवत. सुखदेव थोरला. शेतीवर काही भागणार नाही हे त्याला कळाले. तरूण मन, त्यात घरासाठी काही करायचा उत्साह. मावसभाऊ अंबादास रोकडे सैन्यात होते. त्यांच्याकडून युद्धाच्या, सैनिकी जीवनाच्या कथा सुखदेवला ऐकायला मिळत. त्यातून त्याला सैन्यात भरती होण्याची आवड निर्माण झाली. सैन्यात भरती झाल्यानंतर त्याला नेमणूक मिळाली ती अशांत काश्मीरमध्ये.आॅपरेशन रक्षकपाकिस्तानी अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये त्यावेळी दहशत माजवली होती. त्यांना पाकिस्तान सरकारची मदत होती. शस्त्र पुरवली जात होती. त्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन रक्षक अभियान सुरू केले. सुखदेव यांची त्यात निवड झाली त्यावेळी त्यांना आभाळ ठेंगणे झाले. २३ एप्रिल १९९६. अतिरेक्यांनी भारतीय सैन्य दलाच्या तळावर पूर्ण तयारीनिशी हल्ला चढवला. त्यांचा प्रतिकार करण्याचा आदेश वरिष्ठांनी सैन्याच्या एका तुकडीला दिला. त्यात सुखदेवचा समावेश होता. अतिरेक्यांना पिटाळून लावा असा आदेश त्यांना देण्यात आला.खडतर प्रसंगप्रसंग एकदम खडतर व युद्धामध्ये कधीही असू नये असा होता. अतिरेकी डोंगरावर वरील बाजूस व भारतीय सैन्य डोंगराच्या तळाशी अशी स्थिती होती. त्यांना भारतीय सैन्य अगदी सहज दिसत होते व टिपताही येत होते.वरिष्ठांचा आदेश होता अतिरेक्यांना पिटाळून लावण्याचा. तो लक्षात घेऊन सुखदेव यांच्या तुकडीने नेट लावला. वरून तुफान हल्ला होत असतानाही डोंगराच्या बरोबर मध्यापर्यंत ते पोहचले. सुखदेवही त्यात होते. ते व त्यांचे सहकारी खालून गोळीबार करत होते. गोळीबार करायचा, लपायला जागा मिळाली की लपायचे व संधी मिळाली की गोळ्या झाडत पुढे जायचे अशी युद्धनिती त्यांनी अवलंबली होती. त्यात त्यांना चांगले यशही मिळत होते.अखेरच्या श्वासातही भारतमाताचसमोरून येणाऱ्या गोळ्या चुकवायच्या व त्याचवेळी आपणही समोर गोळ्या झाडायच्या असा तो प्रकार बराच वेळ सुरू होता. अतिरेकी काही हलायला तयार नव्हते व त्यांना सोडायला भारतीय सैन्याची ही बहादूर तुकडी. सुखदेव यांच्या गोळ्यांना काहीजण बळीही पडले. मात्र त्यांना नव्या दमाची कुमक मिळाली. अशा समरप्रसंगात एखादी गोळी कधी तुमचा घास घेईल सांगता येत नाही. तेच झाले. सू सू करीत चार गोळ्या आल्या व तुकडीच्या अग्रभागी असलेल्या सुखदेव यांच्या छातीवर लागल्या. वाळवण्याचे जवान सुखदेव रोकडे धारातीर्थी पडले. निधड्या छातीने त्यांनी शत्रूचा सामना केला. तीन ते चार गोळया त्यांच्या छातीत लागल्यानंतरही ते काही काळ शुद्धीत होते व भारतमातेचा जयजयकार करीत होते असे त्यांचे त्यावेळचे सहकारी सांगतात.शिस्तीचा माणूससुखदेव यांच्या त्यावेळच्या सहकाºयांनी त्या प्रसंगाची आठवण रोकडे कुटुंबीयांना सांगितली त्यावेळी त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. सुखदेव सैन्यात भरती झाल्यानंतर सुपा येथील हिराबाई पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ऊज्ज्वला व प्रशांत ही मुले झाली. सुखदेव यांच्या मनात सैन्य व सैन्यातील आपली नोकरी याचा फार अभिमान होता. सैन्यातील शिस्त त्यांच्या अंगात अगदी भिनली होती. मुलांनीच काय कोणीही बेशिस्त वागलेले त्यांना आवडत नसे. लगेच ते त्यांना फैलावर घेत. रागावले तरी त्यांच्या मनात प्रेम असे. सुटीवर आल्यानंतर ते शेतीतील कष्टाची अशी सर्व कामे अगदी जाणीवपूर्वक करत असत. हिराबाई, सुखदेव यांचे बंधू महादेव व मेहुणे दगडू पवार यांनाही सुखदेव यांचा अभिमान आहे.अंत्यदर्शनही मिळाले नाहीदुर्दैवाने त्यांना सुखदेव यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. ते शहीद झाल्याची तार सैन्यदल कार्यालयाने केली, मात्र ती पंधरा दिवस उशिराने मिंळाली. रोकडे कुटुंबीय तार मिळाल्यानंतर तिथे पोहचले मात्र त्यांना उशीर झाला होता. कारण सैन्याधिकाºयांनीच त्यांच्या पार्थिवावर तिथेच अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अस्थी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्या. देशासाठी बलिदान दिलेल्या आपल्या पतीच्या त्या अस्थी छातीशी धरून हिराबाई गावात परतल्या. 

शब्दांकन : विनोद गोळे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत