शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

....तर शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग खडतर!

By admin | Updated: April 11, 2016 00:32 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. ही संचमान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त राहणाऱ्या जागांवर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. ही संचमान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त राहणाऱ्या जागांवर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, २० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदलीचा मार्ग आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात साधारण १ हजार ७०० प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात बहुदा नगर जिल्ह्यात इनकमिंग शिक्षकांचे प्रमाण सर्वाधिक राहणार आहे. राज्य सरकार पातळीवर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी विशेष निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०७ शिक्षकांना सशर्त आंतरजिल्हा बदलीसाठी ना-हरकत दाखले दिले होते. त्यानंतर पुन्हा हा विषय थंड झाला आहे. आता पुन्हा या शिक्षकांच्या नजरा २०१५-१६ शिक्षकांच्या संचमान्यतेकडे लागल्या आहेत. या संचमान्यतेनुसार २०० हून अधिक जागा रिक्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यात काही प्रमाणात आंतरजिल्हा बदली शिक्षकांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र, कमी पट असणाऱ्या शाळा बंद केल्यास त्यातून ६२० शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षक चिंतेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा बदलीबाबत मौन बाळगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)संचमान्यतेनंतर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त होणाऱ्या जागांचा तपशील समोर येणार आहे. रिक्त असणाऱ्या जागांची संख्या पाहून वर्षानुवर्षे जिल्ह्याबाहेर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी पुढाकार घेवून परजिल्ह्यात नोकऱ्या करणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यात आणणे, त्यांचा हक्क आहे. त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी पुढाकार घेऊ .-अण्णासाहेब शेलार,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.