शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कर्जतमध्ये मुली उतरल्या रस्त्यावर

By admin | Updated: July 20, 2016 00:24 IST

कर्जत : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २ हजार विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला.

कर्जत : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २ हजार विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला.या विद्यार्थिनींनी तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन दिले. घटनेचा निषेध व मृत विद्यार्थिनीस श्रद्धांजली वाहण्यासाठी हा मूकमोर्चा काढला. त्याचे कर्जत तहसीलसमोर सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या या मूक मोर्चात कन्या विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, समर्थ विद्यालय, अमरनाथ विद्यालय, दादा पाटील महाविद्यालय, सद्गुरू कन्या विद्यालय, डायनामिक, रवीशंकर प्रशाला, स्टार अकादमी अशा विविध शाळांमधील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका मीनाक्षी साळुंके, नगरसेवक सचिन घुले, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ, मुख्याध्यापक युसूफ शेख, चंद्रकांत राऊत, मंदा धगाटे, रेखा शेटे, सानिका पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. नाना सुद्रिक, राम पाटील, ऋषिकेश धांडे,सहायक पोलीस निरीक्षक अजित चिंतले आदी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)कर्जत, राशीन, मिरजगाव, येथे रोडरोमिओंना आळा घालावा, आरोपींना भरचौकात फाशी द्यावी, त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना जागेवरच शिक्षा द्यावी, कर्जत बसस्थानक तसेच रस्त्यावर पोलीस कर्मचारी नेमावेत, आयुष्याची स्वप्ने उधळणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी मुलींनी स्वसंरक्षणास तयार रहावे, मुलींसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करावी, बसची संख्या वाढवावी, मुलींच्या संरक्षणाचे कायदे कडक करावेत, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा, पालकांनीही मुलींप्रमाणेच मुलांवरही बंधने घालावीत, निर्भयाचे हाल केले, तसे आरोपीचे अवयव तोडून त्यांना मारा तेव्हाच खरी श्रद्धांजली ठरेल, अशा संतप्त भावना यावेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या. पारनेर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटना खूपच क्लेशदायक व मानवतेला कलंक लावणारी आहे. लोणी मावळाची घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडावी याचे अत्यंत दु:ख होते. ज्या लोकांनी हे दुष्कृत्य केले त्यांना अत्यंत कठोर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून अशा नराधमांना जरब बसू शकेल. त्यासाठी शासनाने प्राधान्याने शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.४उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून हा खटला चालविण्याची तयारी दर्शविल्याचे समजले. ही बाब निश्चितच चांगली आहे. अलिकडील काळात मानवतेच्या नावाखाली काही लोक फाशीच्या शिक्षेला विरोध करतात. परंतु जेव्हा मानवतेला काळिमा फासणाऱ्या अशा घटना घडतात त्यातील पाशवी प्रवृत्तीला दया दाखविण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून कोपर्डी प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा आणि या दुर्दैवी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा व्हावी. जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही. समाजात महिला आणि मुलींची सुरक्षितता हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. यासाठी सरकार, पोलीस यंत्रणा आणि समाजाने अधिक दक्ष रहायला हवे. ४जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. तसेच अशा घटना घडल्यानंतर त्यावर वादविवाद न करता त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पहायला हवे आणि पीडित कुटुंबाला सामाजिक आधार द्यायला हवा, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.