शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

रोहित्र जळाल्याने राहुरी तालुक्यातील दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:18 IST

महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत.

राहुरी : महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने लक्ष न दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा मंगळवारी शेतक-यांनी दिला.भिंगारकर रोहित्रावर ३५ वीज जोड आहेत. दीड महिन्यात हे रोहित्र दुस-यांदा जळाले. गेल्या तीन आठवड्यांपासून पुन्हा रोहित्र जळाल्याने शेतक-यांनी महावितरणाला रोहित्र दुरूस्ती करण्यासंदर्भात विनंती केली. शेतक-यांनी वीज देयके भरल्याची झेरॉक्सही महावितरणकडे दिली. मात्र महावितरणने लक्ष न दिल्याने पाणी असूनही शेतातील उभी पिके जळतांना बघण्याची नामुष्की शेतक-यांवर आली आहे.रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणकडून अहवाल हवा असतो. मात्र महावितरणने अहवाल न दिल्याने नादुरूस्त रोहित्र शेतातच आहे. रोहित्र काढून नवीन रोहित्र मिळणे गरजेचे आहे. रोहित्र दुरूस्त करण्याची सुविधा राहुरी येथे नाही. त्यामुळे थेट बाभळेश्वरला रोहित्र घेऊन जावे लागते. त्यानंतर शेतक-यांना दुसरे रोहित्र दिले जाते. रोहित्र पोहच करण्यासाठी शेतक-यांनाच महावितरणच्या कर्मचा-यांना वाहन पुरवावे लागते. श्रीरामपूर, बाभळेश्वर किंवा बाभूळगाव येथे पर्यायी रोहित्र उपलब्ध होते. राहुरी येथे मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर रोहित्र जळत असताना स्थानिक पातळीवर रोहित्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपअभियंत्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

उसाचे पीक ३० कांडयांवर आले आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासन रोहित्र नादुरूस्त आहे. त्यामुळे पीक जळू लागले आहे. परिसरातील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी वीज बिल भरूनही महावितरण दखल घेत नाही़ रोहित्र दुरूस्तीसाठी शेतक-यांना बरेच दिवस वाट पहावी लागते. दुरूस्तीसाठी राहुरी येथे सुविधा उपलब्ध पाहिजे. विजेचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.-मुरलीधर वराळे, ऊस उत्पादक शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीmahavitaranमहावितरण