शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतीला हवे पाणी, चेंबरला हवे मानवी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:19 IST

शहराच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सांडपाणी तर सांडपाण्याच्या चेंबरला माणसांचे बळी हवे आहेत़

प्रमोद आहेर शिर्डी : शहराच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सांडपाणी तर सांडपाण्याच्या चेंबरला माणसांचे बळी हवे आहेत़ दोन घटनेत तब्बल सहा जणांचे बळी गेल्यानंतरही रविवारी पुन्हा एकाने या चेंबरमध्ये उतरण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासन हतबल आहे.नगरपंचायत, साईसंस्थानची पाणी योजना तसेच शहरातील खासगी बोअरवेल, विहिरी या माध्यमातून शहरातून रोज जवळपास एक कोटी लिटर सांडपाणी बाहेर पडते़ यातून शिर्डी, रूई व पिंपळवाडी परिसरातील एक हजार एकर जमीन बागायती झाली आहे.नगरपंचायतीने सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे़ संपूर्ण नाशिक विभागात नाशिक महापालिका वगळता केवळ शिर्डीतच असा प्रकल्प आहे़ प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी एका मोठ्या टँकमध्ये साठवले जाते़ येथून मात्र केवळ बावीस शेतकरी अधिकृत पाणी उपसा करतात़ त्यांच्याकडून नगरपंचायत प्रती हॉर्सपॉवर साडेसात हजार रूपयांप्रमाणे आकारणी करते़ यातून नगरपंचायतीला दरवर्षी पंधरा लाख रूपये मिळतात़या प्रकल्पाकडे पिंपळवाडी रोड व बनरोडने मोठ्या ड्रेनेजच्या पाईपलाईन जातात़ प्रकल्पात पाणी पोहचण्यापूर्वीच या लाईनवरील चेंबरमधून अनेक शेतकरी पानबुडी किंवा मोटारीच्या सहाय्याने पाणी उचलतात़ हे चेंबर काही ठिकाणी दहा फुटापेक्षा अधिक खोल आहे़ मोटरच्या फुटबॉलला कचरा अडकला तर मोटार किंवा फुटबॉलवर ओढून दुरूस्त करण्याऐवजी मध्ये उतरुन कचरा काढला जातो. चेंबरमध्ये पाणी अडविण्यासाठी फळ्या, वाळूच्या गोण्या टाकल्या जातात. या चेंबरमध्ये हायड्रोजन सल्फाईड, मिथेनसारखे घातक वायू असतात़ आॅक्सिजनअभावी माणूस बेशुद्ध पडू शकतो़ यातूनच दोन्ही अपघात झाले़ सांडपाण्यातील विषारी द्रव्यामुळे शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची भीती आहे़ परिसरातील विहिरीतही हे पाणी उतरते. या सांडपाण्यावर होणारा भाजीपाला, फळे तसेच वापरातील पाणी मानवी आरोग्याकरिता अपायकारक आहे का? याबाबत कृषी विभाग व नगरपंचायतीने संशोधन करून शेतकºयांना मार्गदर्शन करायला हवे़पाणी उचलण्याचा प्रस्ताव शासनाकडेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार प्रकल्पात शुद्ध झालेले पाणी पंपाने उचलून शहराच्या पश्चिम भागात नेऊन ते पाटबंधारे विभागाच्या दोन कालव्याद्वारे शहरात बारमाही फिरवण्यात येईल़ यासाठी नगरपंचायतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे़ या कालव्यामुळे शहरात भूजल पातळी उंचावेल़ हे पाणी नाममात्र शुल्क देऊन शेतकरी अधिकृत घेऊ शकतील, असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी