शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शेतीला हवे पाणी, चेंबरला हवे मानवी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:19 IST

शहराच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सांडपाणी तर सांडपाण्याच्या चेंबरला माणसांचे बळी हवे आहेत़

प्रमोद आहेर शिर्डी : शहराच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सांडपाणी तर सांडपाण्याच्या चेंबरला माणसांचे बळी हवे आहेत़ दोन घटनेत तब्बल सहा जणांचे बळी गेल्यानंतरही रविवारी पुन्हा एकाने या चेंबरमध्ये उतरण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासन हतबल आहे.नगरपंचायत, साईसंस्थानची पाणी योजना तसेच शहरातील खासगी बोअरवेल, विहिरी या माध्यमातून शहरातून रोज जवळपास एक कोटी लिटर सांडपाणी बाहेर पडते़ यातून शिर्डी, रूई व पिंपळवाडी परिसरातील एक हजार एकर जमीन बागायती झाली आहे.नगरपंचायतीने सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे़ संपूर्ण नाशिक विभागात नाशिक महापालिका वगळता केवळ शिर्डीतच असा प्रकल्प आहे़ प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी एका मोठ्या टँकमध्ये साठवले जाते़ येथून मात्र केवळ बावीस शेतकरी अधिकृत पाणी उपसा करतात़ त्यांच्याकडून नगरपंचायत प्रती हॉर्सपॉवर साडेसात हजार रूपयांप्रमाणे आकारणी करते़ यातून नगरपंचायतीला दरवर्षी पंधरा लाख रूपये मिळतात़या प्रकल्पाकडे पिंपळवाडी रोड व बनरोडने मोठ्या ड्रेनेजच्या पाईपलाईन जातात़ प्रकल्पात पाणी पोहचण्यापूर्वीच या लाईनवरील चेंबरमधून अनेक शेतकरी पानबुडी किंवा मोटारीच्या सहाय्याने पाणी उचलतात़ हे चेंबर काही ठिकाणी दहा फुटापेक्षा अधिक खोल आहे़ मोटरच्या फुटबॉलला कचरा अडकला तर मोटार किंवा फुटबॉलवर ओढून दुरूस्त करण्याऐवजी मध्ये उतरुन कचरा काढला जातो. चेंबरमध्ये पाणी अडविण्यासाठी फळ्या, वाळूच्या गोण्या टाकल्या जातात. या चेंबरमध्ये हायड्रोजन सल्फाईड, मिथेनसारखे घातक वायू असतात़ आॅक्सिजनअभावी माणूस बेशुद्ध पडू शकतो़ यातूनच दोन्ही अपघात झाले़ सांडपाण्यातील विषारी द्रव्यामुळे शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची भीती आहे़ परिसरातील विहिरीतही हे पाणी उतरते. या सांडपाण्यावर होणारा भाजीपाला, फळे तसेच वापरातील पाणी मानवी आरोग्याकरिता अपायकारक आहे का? याबाबत कृषी विभाग व नगरपंचायतीने संशोधन करून शेतकºयांना मार्गदर्शन करायला हवे़पाणी उचलण्याचा प्रस्ताव शासनाकडेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार प्रकल्पात शुद्ध झालेले पाणी पंपाने उचलून शहराच्या पश्चिम भागात नेऊन ते पाटबंधारे विभागाच्या दोन कालव्याद्वारे शहरात बारमाही फिरवण्यात येईल़ यासाठी नगरपंचायतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे़ या कालव्यामुळे शहरात भूजल पातळी उंचावेल़ हे पाणी नाममात्र शुल्क देऊन शेतकरी अधिकृत घेऊ शकतील, असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी