शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये ...

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये मोठी अडचण येत आहे. गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचाही लपंडाव सुरू आहे. वैश्विक कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली आहे. मात्र, पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहेत. राज्यात चालूवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास उशीर न करता उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे. पाणी उशिरा सोडल्यास उभ्या पिकांचे नुकसान होणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.