शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये ...

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये मोठी अडचण येत आहे. गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचाही लपंडाव सुरू आहे. वैश्विक कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली आहे. मात्र, पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहेत. राज्यात चालूवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास उशीर न करता उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे. पाणी उशिरा सोडल्यास उभ्या पिकांचे नुकसान होणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.