शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये ...

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये मोठी अडचण येत आहे. गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचाही लपंडाव सुरू आहे. वैश्विक कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली आहे. मात्र, पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहेत. राज्यात चालूवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास उशीर न करता उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे. पाणी उशिरा सोडल्यास उभ्या पिकांचे नुकसान होणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.